I made this widget at MyFlashFetish.com.

Wednesday, October 14, 2009

धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे:-


कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.

*धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे?
भगवान धनवंतरीची पूजा करा.
घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करा.
सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.
मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा.
तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करा.
कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावा.

*धनत्रयोदशी पूजेत काय करावे.
अ)कुबेर पूजन
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवा. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाका.
संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करा.
कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्र म्हणा.
''श्रेष्ठ विमानावर विराजमान, गरूडाप्रमाणे भासणारा, दोन्ही हातात गदा धारण करणारा, डोक्यावर श्रेष्ठ मुकुट करणार्‍या, भगवान शंकराचा प्रिय मित्र निधीश्वर कुबेर मी तुझे ध्यान करतो आहे.''

*खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा.
'यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये
धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।'

नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करा.

ब) यम दीपदान
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा.
गंध, पुष्‍प आणि अक्षतांनी पूजा करा आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा.

'मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।'

आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते.

यमराज पूजन
या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा.
घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावा. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करा.

Monday, September 21, 2009

शारदीय-नवरात्रौत्सव:-



*देवीसूक्तम:-
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥१॥

रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः ।
ज्योत्स्ना यै चेन्दुरुपिण्यै सुखायै सततं नमः ॥२॥

कल्याण्यै प्रणतां वृध्दै सिध्दयै कुर्मो नमो नमः ।
नैऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः ॥३॥

दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ।
ख्यातै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥४॥

अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः ।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः ॥५॥

या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शाध्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥६॥

या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥७॥

या देवी सर्वभूतेषु बुध्दिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥८॥

या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥९॥

या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१०॥

या देवी सर्वभूतेषु छायारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥११॥

या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१२॥

या देवी सर्वभूतेषु तृष्णारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१३॥

या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१४॥

Sunday, August 23, 2009

कहाणी ऋषिपंचमीची:-

ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई.

एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरींचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाक लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं, तो सैंपाक टाकून दिला, पुन्हा सैंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्टं देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडू लागली.

बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दु:खी झाला.

दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.

तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषिपंचमीचं व्रत कर! ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुधंतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्षं करावं शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिलं.

त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.

Thursday, August 13, 2009

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली:-


*देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

*राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

*ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

*संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

*राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

*संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

*राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

*ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.

*ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

*केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

Tuesday, August 4, 2009

नारळी पौर्णिमा:-

समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. याद‍िवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात.

श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्‍यालगत राहणार्‍या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

रक्षाबंधनाचे महत्त्व:-

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र सण एकाच दिवशी साजरे करण्यात येतात. प्राचीन व महाभारतकालीन ग्रंथातही या सणाचा संदर्भ सापडतो. देव व असुर यांच्यातील संघर्षात देवांचा जय झाल्यानंतर या सणास सुरूवात झाल्याचेही मानण्यात येते. दंतकथेनुसार देव व असुर यांच्यातील युद्धात देवांची पीछेहाट होत असलेली बघून देवराज इंद्र यांनी युद्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला. इंद्राची पत्नी इंद्राणीने त्याच्या हातात रक्षाबंधन केले. यामुळे त्यांना युद्धात विजय प्राप्त झाला. पुराणांनुसार श्रावण पौर्णिमेस पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद पवित्र मानले जातात.

या सणांस धर्मबंधनाचे स्वरूपही आहे. मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरूवात झाली. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा म्हणून प्रचलित असलेल्या ह्या सणाच्या दिवशी पर्जन्यदेवता वरूण राजाची आराधना करण्यात येते.

या पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते. भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस दागिने, कपडे यासारख्या भेटवस्तू देतात. रक्षाबंधनास सलोनो नावानेही ओळखले जाते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा तळ्यात स्नान करून सूर्यदेवास अर्घ्यदान करण्यात येते. गावानजीक नदी नसल्यास विहिरींवरही ही पूजा केली जाते. ब्राह्मण या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन जानवे धारण करतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेस श्रावण नक्षत्र असल्यास त्यास अनुकूल व लाभदायक मानण्यात येते.

आश्विनीपासून रेवतीपर्यंत 27 नक्षत्रात श्रावण नक्षत्राचा क्रम बावीसावा आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. श्रावण महिन्यातील अंतिम तिथीस येणार्‍या श्रवण नक्ष‍त्राच्या पौर्णिमेस म्हणूनच श्रावणी म्हणण्यात येते. या दिवशीच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतो.

श्रावण आणि रक्षाबंधन;-
'श्रवण' नक्षत्रात बांधला जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहे. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण मासचे नामकरण 'श्रवण' नक्षत्रावरून झाले आहे. तर श्रवण नक्षत्राचे नामकरण मातृ-पितृ भक्त श्रावणकुमारच्या नावावरून झाले आहे. श्रवण नक्षत्रात तीन तारे असतात. ते तीन चरणांची (विष्णूची वामनावतारातील तीन पद) प्रतीके आहेत. याचप्रमाणे अभिजीत नक्षत्र दशरथ राजा यांचे प्रतीक आहे.

उत्तरा भाद्रपद नक्षत्र स्त्री-पुरुषांची जोडी असून श्रावणकुमारचे आई-वडील आहेत. उत्तराषाढ नक्षत्र हे दशरथ राजाचे व्यासपीठ असून पूर्वाभाद्रपदावर श्रावणकुमार आपल्या आई-वडीलांसोबत स्थानबध्द झाले आहेत.

श्रावण महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असतो. कर्क राशी ही जलचर राशी आहे. दशरथ राजाने श्रावणी पौर्णिमेला आपल्या पापाचे प्रायश्चित घेतले होते. त्याचप्रकारे पृथ्वीवरील लोक श्रावण मासात अधिक कर्मकांड करताना दिसतात. श्रावण मास अध्ययन व अध्यापनासाठी श्रेष्ठ मानला जातो. 28 नक्षत्रांमध्ये श्रावणाने विशेष महत्त्व प्राप्त केले आहे. श्रावण नक्षत्रात ज्यांचा जन्म होतो, ते स्वभावाने पराक्रमी, स्वाभिमानी, सहनशील, स्पष्टवादी व सेवाभावी असतात. तसेच ते चांगली प्रगती साधतात. परंतु शत्रूच्या भी‍ती पोटी चांगले कार्य अर्ध्यातून सोडून देत असतात.

रक्षासूत्र व श्रवण नक्षत्र यांचाही संबंध आहे. मोहरी, केशर, चंदन, अक्षदा, दूर्वा, सूवर्ण आदी कापडात बांधून ते पुरुषांच्या उजव्या व महिलांच्या डाव्या हातावर बांधून रक्षाबंधन पूर्वी केले जात होते. मात्र काळानुरूप परंपरेत परिवर्तन घडून आल्याने रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा उत्सव झाला आहे. या दिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करते मात्र त्यासोबत त्याच्यावर असलेल्या कर्तव्यांची जाणीव ही करून देत असते.

Sunday, August 2, 2009

कहाणी श्रावण महिन्यातील:-

*कहाणी सोमवारची फसकीची:-
ऐका महादेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, त्यांत गरीब सवा‍शीण बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणमास आला, म्हणजे काय करावं? दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्याव. एक उपडा दुसरा उताणा पसाभार तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावं पूजा करावी, नंतर प्रार्थनेच्या वेळी 'जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी,' असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं.
असं चारी सोमवारी तिनं केलं. शठकर तिला प्रसन्न झाला. दिवसोंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठविला. आणि आपल्या व्रताची समाप्ति केली. शंकरांनी तिला निरोप पाठविला- अजून तुल नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Tuesday, July 28, 2009

श्रावणी सोमवारचे व्रत:-



श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताचा विधी सर्व व्रतांत सारखाच असतो. हे व्रत श्रावण महिन्यात सुरू करणे शुभ मानले जाते.

श्रावणी सोमवारचे व्रत सूर्यादयापासून प्रारंभ करून तिसर्‍या प्रहरापर्यंत केले जाते. शंकराच्या पूजेनंतर सोमवार व्रताची कथा ऐकणे गरजेचे आहे. हे व्रत करणार्‍याने दिवसातून एकदाच जेवायला हवे.

श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे.
गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे.
घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती वा चित्र ठेवावे.

पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा:-

'मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'

त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करा:-
'ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌॥

ध्यानानंतर 'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐका.
त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.
मग भोजन वा फलाहार घ्या.

श्रावणी सोमवार व्रताचे फळ:-
सोमवारचे हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात.

मंगळागौरीचे व्रत:-

श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.

असे करतात मंगळागौरीचे व्रत:-
आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते.

ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते.

पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे.

जागरणाची धमाल:-
फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.

जिवत्या : नागनरसोबा:-



*श्रावण महिन्यांत सुवासिनी स्त्रिया जिवतीची पूजा दर शुक्रवारी करतात. छार्पाल नागनरसोबाची चित्रे मिळतात.
त्यांची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा व चार शनिवारी नरसोबाची पूजा,
चारी बुधवारी बुधाची पूजा व गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात.

*प्रत्येक पूजेच्या वेळी कापसाची गजमाळ व आघाडा, दूर्वा यांची माळ वाहतात. दर शुक्रवारी जिवत्यांची पूजा, पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवास आमंत्रण देऊन दूध-साखर व फुटाणे देतात. मुलाबाळांच्या सुखरूपतेसाठी जिवतीची पूजा करण्याची पद्धत आहे.

कहाणी नागपंचमीची:-
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.

शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!

एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.

नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Wednesday, April 22, 2009

मनाचे श्लोक:-

|| जय जय रघुवीर समर्थ ||
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढें वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥
मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो । मना अंतरी सार विचार राहो ॥ ४ ॥
मना पापसंकल्प सोडूनी द्यावा । मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व छी छी ॥ ५ ॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे । न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी । सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे । विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारे मना तूची शोधूनी पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥
मना मानसी दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ १२ ॥
मना सांग पां राखणा काय झालें । अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी । बळे लागला काळ हा पाठीलागी ॥ १३ ॥
जीवा कर्मयोगे जनीं जन्म झाला । परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेची गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५ ॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥
मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते । अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे । मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥
मना राघवेवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे । मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥
बहू हिंपुटी होईजे मायपोटी । नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी । अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥
मना वासना चूकवी येरझारा । मना कामना सोडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी । मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥
मना सज्जना हीत माझे करावे । रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा । जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥
न बाले मना राघवेवीण काही । मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो । देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥
रघूनायकावीण वाया शिणावे । जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे । अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥
मना वीट मानू नको बोलण्याचा । पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे । पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥
देहेरक्षणाकारणे यत्न केला । परी शेवटी काळ घेऊन गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची । पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥
भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
घूनायकासारिखा स्वामि शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥
दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे । बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥
महासंकटी सोडिले देव जेणे । प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥
अहल्या शिळा राघवे मुक्त केली । पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥
उपेक्षी कदा रामरूपी असेना । जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥
असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥
सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥
मना प्रार्थना तूजला एक आहे । रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
विकिकरणअवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । जयाचेनि योगे समाधान बाणे ॥
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥
मना पाविजे सर्वही सूख जेथे । अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥
विविके कुडी कल्पना पालटीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥
बहू हिंडता सौख्य होणार नाही । शिणावे परी नातुडे हीत काही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥
बहुतांपरी हेचि आता धरावे । रघूनायका आपुलेसे करावे ॥
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥
मना सज्जना एक जीवी धरावे । जनीं आपुले हीत तुवां करावे ॥
रघूनायकावीण बोलो नको हो । सदा मानसी तो निजघ्यास राहो ॥ ४३ ॥
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी । कथा आदरे राघवाची करावी ॥
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे । सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥
जयाचेनि संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येउनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥
मना जे घडी राघवेवीण गेली । जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे । जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥
मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे । जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा । सदा रामनामे वदे सत्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥
सदा बोलण्यासारिखे चालताहे । अनेकी सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥
नसे अंतरी काम नानाविकारी । उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥
मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी । प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे । न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी । सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥
नसे मानसी नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥
जगी होइजे धन्य या रामनामे । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥
नको वासना वीषयी वृत्तिरूपे । पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा । मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनी कामना राम नही जयाला । अती आदरे प्रीति नाहि तयाला ॥ ५९ ॥
मना राम कल्पतरू कालधेनू । निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता । तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥
उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥
जनीं सज्जनीं वाद हा वाढवा । पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥
निजध्यास तो सर्व तूटोनी गेला । बळे अंतरी शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदे बुडाला । मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥
घरी कामधेनू पुढे ताक मागे । हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे । तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥
अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना । अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे । अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥
धरी रे मना आदरे प्रीति रामी । नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥
नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे । करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥
घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥
बळे आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥
सुखानंदकारी निवारी भयाते । जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥
सदा रामनामे वदा पूर्णकामे । कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥
जयाचेनि नामे महादोष जाती । जयाचेनि नामे गती पाविजेती ॥
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥
न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥
देहेदंडणेचे महादुःख आहे । महादुःख ते नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥
बहुतांपरी संकटे साधनांची । व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥
समस्तांमधे सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधूत पाहे ॥
जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥

Thursday, April 9, 2009

बजरंगबली की जय:-



हनुमानापासून काय शिकायचे तर त्याचा विनम्रपणा. शक्तीशाली असूनही विमन्रता त्याच्यात होती. म्हणूनच तो अत्युच्चपदाला पोहोचला. केवळ भुजात बळ आहे, म्हणून दादागिरी करणार्‍या आजच्या 'बलभीमांनी' हनुमंताकडून ही गोष्ट आवर्जून शिकली पाहिजे. एखादी बलवान व्यक्ती कुणापुढे झुकत असेल तर तो नक्कीच विनम्रपणा समजावा. बुध्दी व बळ यांचा संयोग त्याच्या ठिकाणी असतो, हे लक्षात घ्यावे.

श्रीराम व सुग्रीव यांचे कोणतेच काम हनुमानाशिवाय पूर्ण होत नव्हते. हनुमान दोन्ही हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहत असत. रावणाने हनुमानाच्या नम्रतेला लाथाडून त्याच्याशी चार हात करण्याची हिंमत दाखवली आणि त्याला आपली सोन्याची लंका जळालेली बघावी लागली.

बुद्धी व शक्ती यांच्या मीलनापुढे कुणाचेही काहीही चालत नाही. भारतीय संस्कृतीत दोन महावीर मानले जातात. ते म्हणजे हनुमान व वर्धमान. एक परम भक्त तर दूसरे अहिंसेचे पुजारी. अहिंसकतेशिवाय भक्ती अशक्य आहे. 'जय हनुमान' म्हटल्यानेही संकट, भीती दूर झाल्यासारखे वाटते.

अंजनी पुत्र : सुमेरु पर्वताचे राजा केसरी हे हनुमानाचे पिता होते. अंजना ही माता असल्याने हनुमानाला अंजनी पुत्र म्हटले जाते.

पवन पुत्र : हनुमानाला पवनपुत्रही म्हटले जाते. वायुला मारूत म्हटले जाते. मरूत म्हणजे वायु. त्यावरून हनुमानाला मारूती असे म्हटले जाते. पवनाच्या वेगासमान हनुमानामध्ये उडण्याची शक्ती असल्याने पवनपुत्र असेही म्हणतात.

हनुमान : इंद्रदेवाच्या वज्रप्रहाराने हनुमानाची हनुवटीला जबर मार लागला होता. तेव्हापासून पवनपुत्राचे नाव हनुमान म्हणून प्रचलित झाले होते.

बजरंगबली : वज्राला धारण करणारे व वज्रासारखे टणक अर्थात बलवान शरीर असलेल्या हनुमानाला बजरंगबली (बजरंगबली) असे म्हटले जाऊ लागले.

श्रीमारुतिस्तोत्र:-
भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुति
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥
महाबळी प्राणदाता, सकंळा उठवी बळें ।
सोख्यकारी दःखहारी, दुत वैश्ण्वगायका ॥
दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता, भव्यसिंदुरलेपन ॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा, पुरातना ।
पुण्यवंता,पुण्यशीला, पावना परितोशका ॥
ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोट्ला पुढे ।
काळाग्नी , काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥
ब्रम्हांडे माइली नेणों, आंवळें दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भुरकुटी,ताठिल्या- बळें ॥
पुछ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंड्लें बरीं ।
सुवर्णकटिकासोटी,घंटा किंकिणि नागरा ॥
ठकारे पर्वताऐसा, नेट्का सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठे, महाविध्युल्लतेपरी ॥
कोटिच्या कोटि उड्डाणें, ज़्हेपावें उत्तरेकडे ॥
मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधें उत्पाटिला बळे ॥
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगतीं ।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥
अणुपासोनी ब्र्म्हांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें, मेरुमांदार धाकुटे ॥
ब्र्म्हांडाभोंवतें वेढे, वज्रपुछए करुं शके ।
तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडीं पाहतां नसे ॥
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सुर्यमंड्ळा।
वाढ्ता वाढता वाढे, भेदिलें शुन्यमंडळा ॥
धनधान्य्पशुवृध्दि, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती परुपविद्यादि, स्तोत्रपाठें करुऐयां ॥
भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तहि ।
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ।
हे ध्ररा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ॥
दृढदेहो निसंदेहो सैख्या च्न्द्रकळागुणें ॥
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू ।
रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोश नासती ॥
।। इति श्रीरामदासक्रुत संकटनिवारसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं ॥

Friday, March 27, 2009

शालिवाहन शक म्हणजे काय?

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मात्र, आपल्याला फारशी माहिती नसते.

शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.

याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.

शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.

शक संवत- शंक संवताचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.

विक्रम संवत- भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याच्या शास्त्रीय विधी या आहेत ज्या शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाची स्मृतीत आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याची संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते.

Tuesday, March 24, 2009

गुढीपाडव्याचा गुढार्थ :-

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवाहन शक नावाच्या कुंभार समाजाच्या मुलाने याच दिवशी मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपडले आणि त्यांना सजीव बनविले. त्यांच्या मदतीने शत्रूंचा सामना केला. या विजयाच्या प्रित्यर्थ शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला.

शालिवाहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे. त्यावेळी लोक चैतन्यहीन, पौरूषहीन आणि पराक्रमहीन बनले होते. त्यामुळे शत्रूसमोर त्यांचा टिकाव लागत नव्हता. मातीपासून निर्मित सैन्य विजयश्री कसे मिळवून देऊ शकते? पण शालिवाहनने त्या चैतन्यहीन लोकांमध्येही चैतन्यांचा संचार केला. पौरूष्य आणि पराक्रम जागविला आणि शत्रू पराजीत झाला.

आजच्या झोपलेल्या चैतन्यहीन समाजाला जागे करण्यासाठीही अशा शालिवाहनांची आवश्यकता आहे. मानवात ईश्वरीशक्ती आहेच. पण आवश्यकता आहे ती त्याला जागविण्याची. आजच्या दिवशी पुरूषार्थ गाजविणारा आणि पराक्रमी सांस्कृतिक वीरांचा समाज तयार करण्यासाठी सुरवात व्हायला हवी.

याच दिवशी श्री रामचंद्रांनी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघरी उत्सव साजरा करीत गुढ्या उभारल्या होत्या. महाराष्ट्रात आजही घराच्या अंगणात गुढ्या उभारण्याची प्रथा प्रचलित आहे. त्यामुळेच या दिवसाला 'गुढीपाडवा' हे नाव मिळाले. घराच्या अंगणात उभारण्यात येणारी ही गुढी विजयाचा संदेश देते. गुढी म्हणजे विजयी पताका. भोगावर योगाचा विजय. विकासावर विचारांचा विजय. मंगलमय आणि पवित्र वातावरणात सतत प्रसारीत करणारी ही गुढी उभारणार्‍याला आत्मनिरिक्षण करून बघावयास हवे की माझे मन शांत, स्थिर आणि सात्विक बनले आहे की नाही?

मलबारमध्ये हा उत्सव विशिष्ट पध्दतीने साजरा केला जातो. घराच्या देवगृहात घरातील सर्व संपत्ती शोभेच्या वस्तू व्यवस्थित मांडून ठेवतात. या दिवशी सकाळी लवकर उठून डोळे उघडल्याबरोबर गृहलक्ष्मीसोबत प्रभूचे दर्शन घेतात. घरातील मुख्य व्यक्ती संपत्ती आणि ऐश्वर्य याने सुशोभित होऊन देवाची आरती करतात. मलबारमधील या प्रथेमागे भारतीय संस्कृतीची झलक दिसते. रोज सकाळी-सकाळी शुभ दर्शन करणार्‍याचा पूर्ण दिवस चांगला जातो असे आपम मानतो. मग वर्षारंभाच्याच दिवशी प्रभूचे दर्शन करणार्‍याचे वर्ष चांगलेच जाईल. यात आश्चर्य ते काय?

या दिवशी कडूलिंबाची पाने चावून खाल्ली जातात. मंदिरात दर्शन करणार्‍याला कडूलिंब आणि साखर प्रसादाच्या रूपात मिळते. कडूलिंब कडू असतो. पण आरोग्यासाठी लाभदायी असतो. त्याचे सेवन करणारा नेहमी निरोगी राहतो. काही विचार कितीही त्रासदायी असले तरी जीवनाला उदात्त बनवितात. अशात सुंदर, सात्विक विचारांचे सेवन करणार्‍यास मानसिक आणि बौध्दिक आरोग्य मिळते. त्याचे जीवन निरोगी बनते. प्रगतीच्या रस्त्यावर चालणार्‍याला जीवनात कितीदा तरी 'कडू घोट' प्यावे लागतात हे देखील यात दिसते.

मंदिरात मिळणार्‍या साखर आणि लिंबाच्या पानाच्या प्रसादामागे मधूर भावना असते. जीवनात सुख, दु:ख कधीच एकटे येत नाही. सुखामागे दु:ख आणि दु:खामागे सुख दडलेले असते. थोडक्यात हा उत्सव चैतन्यहीन मानवात चेतना भरून त्याच्या अस्मितेला जागृत करतो.

रामनवमी व्रत कसे करावे?

चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते.या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता.
भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.

रामनवमी व्रत कसे करावे?
* व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.
* दुसर्‍या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.
* त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.
* 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव|
तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||'या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.
* त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये'
हा संकल्प करून काम- क्रोध- लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.
* मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.
* घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
* कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.
* त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.

रामनवमीच्या दिवशी काय करावे?
* या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.
* दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.
* तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे.
* या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा.
* प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.
* दुसर्‍या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.
* गरीब आणि ब्राम्हणांना दान करून त्यांना जेवू घालावे.

रामनवमी व्रताचे फळ:-
* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्‍यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.

रामरक्षास्तोत्र:-
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता। अनुष्टुप्‌ छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान्‌ कीलकम्‌ । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ।
अथ ध्यानम्‌:
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ । वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकार दीप्तं दधतमुरुजटामंडलं रामचंद्रम ।

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥1॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥2॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरांतकम्‌ ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥3॥
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न दृष्टुमति शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥
वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥14॥
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्‌ ।
अभिरामस्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥
तरुणौ रूप सम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥
शरण्यौ सर्र्र्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्‌ ॥20॥
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथान्नश्च रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥22॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥
रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्‌ ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ ।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥26॥
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥
श्रीराम राम रघुनन्दनराम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचंसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥
माता रामो मत्पिता रामचन्द्रः
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयलुर्नान्यं
जाने नैव जाने न जाने ॥30॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम्‌ ॥31॥
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥34॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌ ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥35॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्‌ ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्‌ ॥36॥
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥

Sunday, February 15, 2009

शिवकल्याण राजा:-



निश्चयाचा महामेरु....
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.

जय जय शिवराया:-
प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया.

शिवरायांचा पाळणा:-
गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||

हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||

चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||
ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान

हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||

आरती संग्रह:-

श्री गणप‍‍तीची आर‍‍ती:-
सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।।२ ।।
लंबोदर पीतांबर फ‍ण‍ीवरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।

देवीची आरती:-
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥

जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।
सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥

तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही॥२॥

प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।
क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥३॥

श्री कृष्णाची आरती:-
ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।।
चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। ओवाळू।।1।।
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। ओवाळू।।2।।
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू।।3।।
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान । तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ओवाळू।।4।।
एका जनार्दनी देखियले रूप । पाहता जाहले अवघे तद्रूप ।ओवाळू।।5।।

श्री विठ्ठल आरती :-
युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। धृ ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनि कटी ।
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनूमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।।

धन्य वेणुनाद अनुक्षेपत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। जय देव ।।

धन्य पुष्पावती भीमासंगम ।
धन्य वेणूनाद उभे परब्रम्ह ।
धन्य पुंडलिक भक्त निर्वाण ।
यात्रेसी येती साधु सज्जन ।। जय देव ।।

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। जय देव ।।
- संत नामदेव

तुळशीची आरती:-
जय देवी जय देवी जय माय तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे ‍तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।

घालिन लोटांगण:-
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

हनुमंताची आरती:-
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।

जय देव जय देव जय हनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।

श्री महालक्ष्मीची आरती:-
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी. जय.....

करवीरपूर वासिनी सुरवर मुनिमाता
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता
कमलाकारे जठरी जन्मविला धाता
सहस्त्र वदनी भूधर नपुरे गुणगाता. जय.....

मातुल्लिंग गदा खेटक रविकिरणी
झळके हाटकवाटी पीयुष रसपाणि
माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी
शशीकर वदना राजस मदनाची जननी. जय......

तारा शक्ती अगम्या शीवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीजा निगमागमसारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी. जय.....

अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी
मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी
वारी माया पटल प्रणमत परिवारी
हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय.....

चतुराननाने कुश्चित कर्मांच्या ओळी
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय.....

मंत्र पुष्पांजली:-
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।

मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

श्री गजानन महाराजांचे शेगाव:-


शेगावमधली ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. रणरणतं ऊन आसमंतात व्यापलं होतं. तेवढ्यात एका वडाच्या झाडाखाली एक विचित्रसा वाटणारा पण तेजःपुंज तरुण फेकून दिलेल्या पत्रावळीवरील अन्नाची शीत वेचून खात होता. त्याच्या तोंडातून 'गण गण गणात बोते' असा नामघोष चालला होता. त्या नामघोषात त्या तरुणाला रणरणत्या उन्हाचंही काही वाटत नव्हतं. गजानन महाराजांच पहिलं दर्शन असं झालं. बंकटलाल आणि दामोदर या दोघा तरुणांनी महाराजांना प्रथम पाहिलं आणि त्यांच्या त्या विचित्र वागण्यापेक्षाही त्यांच्या चेहर्‍यावरच्या तेजस्वी भावानेच हे त्यांच्याकडे आकर्षित झाले.

हे कोणी दिव्य पुरूष आहेत, याची त्यांना खात्री पटली. म्हणून ते त्यांना गावात घेऊन आले. लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागले. त्यांना पंचपक्वान्न, कपडे, दागिने असे काही वाहायला लागले. महाराज निरिच्छपणे ते सगळं फेकून देत असत. त्यांच्या वागण्याचा अदमास कुणालाही येत नसे. ते कुठेही झोप. काहीही खात आणि कपडे घातले तर घातले नाही तर दिगंबरावस्थेतही ते असत.

जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न करत असत. भौतिक जगतात त्यांचे मन अजिबात रमत नव्हते. पण त्यांच्या विक्षिप्तपणाआड एक अतिशय विद्वान दिव्य पुरूष लपला आहे, याची जाणीवही हळू हळू होऊ लागली. त्यांच्या वेदशास्त्रसंपन्नतेचा दाखला लोकांनाही मिळाला. त्यांची तपश्चर्याही मोठी असल्याची जाणीव लोकांना झाली. त्यांच्यातला योगीही दिसून आला. एवढेच नव्हे, तर प्राण्यांची भाषाही या अवलियाला येत होती, हेही लोकांना कळले.

त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागल्यानंतर मोठमोठी मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली. दस्तूरखुद्द लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. श्री वासुदेवानंद सरस्वतीही महाराजांना भेटायला शेगावला आले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटायला येऊ लागली.

सिद्ध योगी असल्याने अनेक चमत्कारही ते करत. अत्यंत कनवाळू असल्याने कुणाचं दुःख त्यांना पाहवत नसे. खरे तर त्यांच्याकडे येणारी गांजलेली मंडळी त्यांना पाहताच आपलं दुःख विसरून जात असत. महाराज त्यांना त्यांच्या दुःखावर उपाय सांगत असत. लोकांच्या दुःखा ची नस त्यांना चांगलीच कळलेली असे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने त्या व्यक्तीचं भलं झाल्याशिवाय राहत नसे. त्यामुळे लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येत.

महाराजांची कीर्ती पुढे वाढतच गेली. विदर्भात तर घरांघरांत ते माहीत होते. पण उर्वरित महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यातही त्यांची कीर्ती वाढत गेली. विदर्भात तर महाराजांना नैवेद्य दाखविल्याशिवाय न जेवणारी मंडळी आजही आहेत. अनेकांनी त्यांना आपले गुरू मानले व त्यांची पूजा सुरू केली. महाराष्ट्रभर त्यांची मंदिरं स्थापली गेली.

महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली जाऊ लागली. हे कार्य आजही चालू आहे. हिंदूच्या अनेक धर्मस्थळी या ट्रस्टच्या उत्तम सुविधा असलेल्या धर्मशाळा आहेत.

हे सगळं करत असताना महाराजांचे भौतिक जगातील लक्ष उडून गेले होते. एके दिवशी त्यांनी पंढरपूरला आषाढी एकादशीला समाधी घेण्याच निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने भक्तांना मोठा धक्का बसला. दुःखाची एक लाटच पसरली. भक्तांनी त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. पण महाराज निर्णयावर ठाम होते. त्यांनी समाधीपूर्वी दीड महिना आधी आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ सांगितली होती. शिवाय आपली समाधी कुठे बांधावी हेही सांगितले होते.

त्यानुसार भाद्रपद शुद्ध पंचमीचा अर्थात ऋषी पंचमी, शके १८३२, गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजीचा तो दिवस उजाडला. या दिवसावरच एक काळे सावट होते. दुःखाची सावली जणू पडली होती. ठरवल्याप्रमाणे महाराजांनी या दिवशी समाधी घेतली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या दुःखाला पारावर उरला नाही. भक्तांना सैरभैर झाल्यासारखं झालं. जीवनात जणू 'राम' राहिला नाही, असं वाटलं. कारण एक चैतन्य अनंतात विलीन झालं होतं. त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी भक्तांचा जणू सागर शेगावात उसळला. भक्तच काय पण महाराजांचं ज्या पशूपक्ष्यांवर प्रेम होतं, तेही रडत असल्याचे सांगितले जाते.

पण तिकडे महाराजांच्या मुखावर मात्र नेहमीचंच हास्य होतं. निर्वाणाला गेलेल्या अवलियाने जाताना मात्र सगळ्यांना सुखाचा समाधानाचा आणि मुक्तीचा मंत्र सांगितला होता. हा मंत्र होता,
अर्थातच 'गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.'
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच एक. शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे.

श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्याचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचेच नामस्मरण, भजन असायचे.

भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात.

कसे पोहचाल?
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे.

स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे 172 बस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बस चालतात.


श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री 9.30 पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात.

प्रमुख उत्सव:-
श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस (फेब्रुवारी महिन्यात) तसेच त्यांची पुण्यतिथी (ऋषी पंचमीला) हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. श्रींची हत्ती, घोडा, रथ पालकी, दिंडी इत्यादींसोबत मिरवणूक निघते.

राहण्यासाठी व्यवस्था:-
भाविकांच्या सुविधेसाठी भव्य 'भक्त निवास' मंदिर परिसरातच बांधले आहे. त्याठिकाणी अगदी स्वस्तात खोल्या मिळतात. भाविक पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस या खोल्यांमध्ये राहू शकत नाहीत. त्या ठिकाणी भोजन कक्षेचीही व्यवस्था आहे. सकाळी अकरा ते एक पर्यंत महाराजांचा प्रसाद दिला जातो. रोज येथे जवळपास पाच हजारांवर लोक जेवण करतात. या मंदिरात दररोज वीस हजार भाविक दर्शनासाठी येतात.

अन्य आकर्षण:-
शहराच्या झगमगाटापासून लांब असलेल्या शेगावात साधे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाच्या सहजतेची झलक पाहावयास मिळते. आध्यात्मिक शांतीच्या शोधात असणार्‍या भाविकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. मंदिराच्या परिसरातच धार्मिक वाचनालय असून भाविकांसाठी सतत खुले असते. जवळच 'गजानन वाटिका' नावाचे सुंदर उद्यान आणि एक प्राणी संग्रहालय देखील आहे.

Thursday, February 12, 2009

रामनामाचा मंत्र देणारे श्री ब्रह्मचैतन्य:-



श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १६४ वा जन्मोत्सव आज (ता. ६ फेब्रुवारी) सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने होत आहे. त्यानिमित्ताने श्री गोंदवलेकर महाराज यांचे रामनाम आणि रामप्रेम यावर प्रकाश टाकणारा लेख...

मानवी जीवनाच्या इतिहासात तिच्या संस्कृतीचा विचार करताना तो दोन अंगांनी केला जातो. बहिरंग आणि अंतरंग ही ती दोन अंगे आहेत. यापैकी व्यक्‍तीच्या श्रेष्ठत्वामध्ये बहिरंगापेक्षा अंतरंग अधिक महत्त्वाचे ठरते. संत परंपरेनेच अवलोकन केले तर असे दिसेल, की बहिरंगाच्या वैभवापेक्षाही अंतरंगाची श्रीमंती त्यांची अधिक होती. श्री क्षेत्र गोंदवले (जि. सातारा) येथे जन्माला आलेले, तीच कर्मभूमी केलेले आणि अखेरीस तेथेच चिरविश्रांती घेतलेले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज लाखो भक्‍तांचे श्रद्धास्थान आहेत. सदगुरू आहेत.

समर्थ रामदासांप्रमाणे प्रभू रामचंद्रांवर श्री ब्रह्मचैतन्यांची आत्यंतिक प्रीती होती. त्यांचे सदगुरू श्रीतुकामाई यांनी श्री ब्रह्मचैतन्यांना अनुग्रह दिल्यावर, तसेच तो प्राप्त होण्याच्या आधीपासूनच श्रीमहाराज रामनामात मग्न होत असत. अखंडपणे जणू काही रामनाम हा त्यांचा श्‍वासच झालेला होता. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही, ही त्यांची ठाम भूमिका होती. आमच्या शास्त्रकारांनी वर्तमान कलियुगात अन्य कोणत्याही साधनेपेक्षा भगवंतांचे नामस्मरण करणे अधिक सोपे आणि सहज आहे, असे सांगितलेले आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी याच शास्त्र विचारांना अनुसरून अनेकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांना नामाला लावले. भगवंतांकडे वळवले.

पारमार्थिक मार्गदर्शन

श्री ब्रह्मचैतन्यांच्या कार्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी मध्यमवर्गीय सामान्य प्रापंचिक माणूस सतत आपल्यासमोर ठेवला. त्याच्या जीवनातील दैनंदिन आणि प्रासंगिक अडीअडचणी समजून घेतल्या. त्या लक्षात घेत त्यांनी पारमार्थिक मार्गदर्शन केले. विकार नाहीसे न करता त्यांना ताब्यात ठेवण्याची किंवा प्रसंगी भगवंताकडे वळविण्याची भूमिका श्री गोंदवलेकर महाराज सतत मांडत असत.

विकारांना किंवा वासनेला नियंत्रित करण्यासाठी नामासारखे दुधारी शस्त्र नाही, अशी त्यांची धारणा होती. श्री गोंदवलेकर महाराज यांनी लहानपणापासूनच त्यांच्या ठिकाणी श्रीरामरायाबद्दल अनुराग होता. श्रीराम चरणी ते इतके विनम्र झाले होते, की या विश्‍वातील कोणतीही गोष्ट श्रीरामचंद्रांच्या इच्छेने घडते, असे त्यांचे ठाम सांगणे होते. श्रीरामाला कर्तेपण द्या, असा त्यांचा आग्रह होता. आपल्या ६८ वर्षांच्या जीवन काळात श्रीमहाराजांनी जवळजवळ ३० राममंदिरे उभारली. मंदिरांच्या निर्मितीमध्ये त्यांची संकल्पना नेहमीपेक्षा काहीशी वेगळी होती. मंदिर हे अध्यात्म विद्येचे केंद्र असावे, प्रापंचिकाला त्याच्या दुःखाचा काही काळ विसर पडावा, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, अशा स्वरूपाचे त्यांचे मंदिराबद्दल विचार होते.

श्रीरामांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. श्रीरामांवर आत्यंतिक श्रद्धा होती. श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्रीरामाच्या मूर्तीतून तीन वेळा अश्रुपात झाल्याचा उल्लेख श्रीमहाराजांच्या चरित्रात आहे. यावरून त्यांचे रामप्रेम लक्षात येते. श्रीरामांबरोबर रामनामाचे श्रेष्ठत्वही ते तितक्‍याच आग्रहाने मांडत. "श्रीराम जयराम जय जय राम', या तारक मंत्राचा अनुग्रह ते अनेकांना देत. या मंत्राचे, त्यातील अक्षरांचे सामर्थ्य ते पटवून देत. या मंत्रात १३ अक्षरे आहेत. या प्रत्येक अक्षरावर एक याप्रमाणे १३ अभंग श्री महाराजांनी रचलेले आहेत. ""श्रीराम म्हणा मुखी राम म्हणा मुखी। तेणे सर्व सुखी होशील तू।।'' या ध्रुवपदाने हे अभंग म्हटले जातात. या १३ अभंगांतून रामनामाला असलेला वेदांचा आधार, कलियुगातील सोपे साधन, मनाची एकाग्रता, प्रपंच, दुःख आणि त्या दुःखाची निवृत्ती, रामनामाचे तारकत्व आदी अनेक विचारांचे मनोज्ञ दर्शन घडते. श्री महाराजांच्या प्रज्ञेचे सामर्थ्य अनुभवाला येते.

""श्रीराम जयराम जय जय राम'' हा तारक मंत्र स्वतः श्रीरामाने सीतेला दिला आणि हनुमंताला दिला, असे श्रीमहाराज सांगत. अनेकांना या मंत्राच्या साधनेने परम अधिकारी बनवले. या मंत्राचा एक अर्थ सिद्धांच्या दृष्टीने "मी रामस्वरूप आहे', असा होतो, तर साधकांच्या दृष्टीने "राम माझा स्वामी आहे, रक्षणकर्ता आहे, माझ्या हृदयात आहे', असे श्रीमहाराज सांगत.

या मंत्रातील शब्दांवरही श्रीमहाराज बोलताना एकदा म्हणाले, ""श्रीराम म्हणजेच पुरुषोत्तम. म्हणजेच सगुण आणि निर्गुण परमात्मा. जयराम म्हणजे सर्वत्र त्या पुरुषोत्तमाचाच जय आहे. तोच कर्ता आहे. त्याचीच शक्‍ती विश्‍वात कार्य करते, तसेच जय जय राम म्हणजे परमात्मा आतबाहेर कल्याणमय आहे. त्या कल्याणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपण करावा. त्याचा जयजयकार करावा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अशारीतीने राममंत्राचा अर्थही उलगडलेला आहे. या रामनामात आपण सतत राहावे. प्रपंच करतानाही रामनामात प्रपंच करावा, ही त्यांची विचारसरणी होती. अन्य कोणत्याही सुखापेक्षा समाधान आणि आनंद याला ते अधिक महत्त्व देतात.

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या उपदेशानुसार खरोखर जो कोणी रामनामात राहिल, तो जीवनात आनंदी आणि समाधानी राहील, हे निर्विवाद सत्य आहे. श्रीमहाराजांच्या जन्मोत्सवाचे निमित्ताने त्यांना श्रद्धेय वंदन.

- लक्ष्मीकांत जोशी, नाशिक

Monday, February 9, 2009

प्रार्थना:-

*गायत्री मंत्र:-
ऒम भूर्भुव:स्व:ऒम तत्सवितुर्वरेण्यंभर्गोदेवस्य धीमहि । धियोयोन:प्रचोदयात॥

*गणपती:-
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

*सरस्वती प्रार्थना:-
याकुन्देतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृताया वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रम्हाच्युतशंडकरप्रभृतिभिर्देवे सदा वन्दितासा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्या पहा॥

*हात पाहून म्हणावयाचा श्लोक:-
कराग्रे वसते लक्ष्मी : करमुले सरस्वती ।करमध्ये तु गोविन्द : प्रभाते करदर्शनम॥

*सायंप्रार्थना:-
(संध्याकाळी देवासमोर दिवा लावून म्हणावयाची प्रार्थना)
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।शत्रुबुध्दीविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते॥

*भोजनश्लोक:-
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फ़ुकाचे ।
जीवन करी जिवित्त्वा अन्न हे पूर्णब्रम्हउदरभरण नोहो जाणिजे यज्ञकर्म ।

*गुरुवंदना:-
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा :गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नम:॥

*मनाचा श्लोक:-
मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पापबुध्दी नको रे।
मना धर्मता नीती सोडू नको होमना अंतरी सार विचार राहो॥

*सुर्यनमस्काराचे मंत्र:-
ऒम मित्राय नम: ऒम खगाय नम:।
ऒम आदित्याय नम:।ऒम रवये नम:।
ऒम पूष्णे नम:।ऒम सविते नम:।
ऒम सूर्याय नमं:। ऒम हिरण्यगर्भाय नम:।
ऒम अर्काय नम:।ऒम भानवे नम:।
ऒम मरीयचे नम:। ऒम भास्कराय नम: ।
ऒम श्रीसवितृसूर्यनारायणाय नम:

Friday, February 6, 2009

राशींच्या संदर्भात माहिती :-

राशींचे तत्व:-
पृथ्वी तत्व :- वृषभ, कन्या, मकर
जल तत्व :- कर्क, वृश्चिक, मीन
अग्नी तत्व :- मेष, सिंह, धनू
वायू तत्व :- मिथून, तुळ, कुंभ

राशीचे रंग:-
मेष- लाल
वृषभ- हिरवा
मिथून- फिक्कट हिरवा
कर्क -लालभडक, पांढरा
सिंह -पिवळा
कन्या -हिरवा
तूळ -नीळा, काळा
वृश्चिक -सोनेरी
धनू -पिवळा
मकर -विटकरी, तांबूस
कुंभ -काळा
मीन फिकट पांढरा

राशीनुसार मुख्य दाराची दिशा:-
मीन, कर्क, वृश्चिक -उत्तर
मेष, सिंह, धनू -पूर्व
वृषभ, कन्या, मकर -दक्षिण
कुंभ, तुळ, मिथून -पश्चिम

राशी अंकात:-
पूर्व -1,5,0,9
दक्षिण- 2,6,10
पश्चिम -3,7,11
उत्तर -4,8,12

जन्मपत्रिकेचे महत्त्व:-

जन्मपत्रिकेच्या मदतीने चालू जीवनातील नियतीला आपण जाणून घेऊ शकतो. जे नशिबात आहे ते बदलता येत नाही पण माणूस आपल्या काय घडणार आहे, हे जाणून घेऊन त्यात सुधारणा करू शकतो. संचितापेक्षा चालू कर्म श्रेष्ठ असतील तर माणसाचे भाग्य बदलू शकते. म्हणून चालू वर्तमान जीवनात चांगले काम करण्यासाठी आणि जीवन कर्मांचे चांगले फळ मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्र आवश्यक आहे.

जन्म-नक्षत्र, राशी, जन्म-पत्रिका व त्यांचे योग याचे विश्लेषण करून व्यक्तीचा स्वभाव, प्रकृती, रंग व चांगल्या वाईट वेळेबरोबर भूत, भविष्य, वर्तमान यांना जाणून घेता येते. त्याच्या मदतीने आपण जमिनीवर दिशेची निवड, मुख्य चौकट बसवणे, रंगाची निवड, घराची बांधणी, गृहप्रवेश या गोष्टी ठरवू शकतो. वास्तुशास्त्राचे सिद्धांच आणि नियमानुसार बांधणी आणि त्याचे परिणाम यासाठी जन्मपत्रिकेचे विश्लेषण आवश्यक आहे.

जन्मपत्रिका बनवणे :-
जन्मपत्रिका तयार करणे गणिती काम आहे. ही माहिती ज्योतिष्याचा कोणत्याही पुस्तकात मिळते. म्हणून या गोष्टीचे विश्लेषण येथे केलेले नाही. हल्ली कॉम्प्युटरवर सोप्या पद्धतीने जन्मकुंडली तयार केली जाते. कॉम्प्युटर वर योग्य पंचांगांच्या मदतीने सॉफ्टवेअर बनवले असेल तर योग्य जन्मवेळ, जन्म तारीख, जन्म ठिकाण दिले गेले तर पत्रिकेत त्रुटींची शक्यता कमी होते.

जन्मपत्रिकेचा व ज्योतिषशास्त्र तसेच वास्तुशास्त्राचा परस्परसंबंध आहे. व्यक्तीचे नाव, जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मठिकाण यांच्या मदतीने पत्रिका बनवली जाते. यात जातकाच्या नावापासून आशय जातकाचे कुटुंब, वर्ण, संस्कार आणि वर्णानुसार आई-वडिलांच्या व्यवसायाशीही संबंध देतात. जन्मवेळ आणि जन्मतारखेत संपूर्ण कालचक्र म्हणजेच ज्योतिषाचा समावेश होतो. जातकाच्या जन्म ठिकाणापासून आशय जातकाचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला आहे तो किती अक्षांशावर राहतो ही सर्व माहिती वास्तुशास्त्रातील आहे.
- डॉ. सुधीर पिंपळे

Thursday, February 5, 2009

वास्तुशास्त्राचे नियम:-

प्राचीन ऋषी-मुनी व शिल्पकार यांनी वास्तुपुरुषाची स्थिती लक्षात ठेवून वास्तु रचना करण्याचे निर्देश दिले आहेत। वास्तू देवतेच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी या निर्देशांचे पालन केले पाहिजे. या शास्‍त्रांच्या विपरित वास्तु बांधल्यास तीथ रहाणार्‍यांना त्रास होतो. अशावेळी घरात जे वास्तु संमत नाही त्यात बदल करून ती वास्तु रहाण्यास अनुकूल बनवू शकता. त्यासाठी खालील उपाय करा. (वास्तुशांति करून घेणे.)
*घरापुढे, मागे, आजूबाजूला खड्डा असेल तर तो लवकरात लवकर भरा।
* घरासमोर कचर्‍याचा ढिगारा असेल, न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल व घाण पाणी साठले असेल तर ते लगेचच साफ करायला हवे। घरासमोर स्वच्छ जागा असणे चांगले।
* किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे नसेल तर आणि ती जागा बदलणे शक्य नसले तर जेवण करताना तोंड उत्तर, पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे।
* घरातील नैऋत्य कोपरा (दक्षिण-पश्चिम) कधीही रिकामा ठेवू नये। तेथे वजनदार सामान ठेवले पाहिजे.
* घरात पाणी साठवण्याचे स्थान उत्तर, पूर्व किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व कोपरा) दिशेला असेल तर ईशान्य कोपर्‍यातच जमिनीच्या आत पाण्याची लहानशी टाकी बनवावी आणि पाणी पिताना तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेत असायला पाहिजे।
* ईशान्य कोपर्‍यात स्वयंपाकघर, बेडरूम किंवा स्टोअर रूम असेल तर ती जागा तातडीने रिकामी करावी। तिथे देवाचे चित्र लावून पूजाअर्चना करा.
* स्वयंपाकघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल आणि ते बदलणे शक्य नसेल तर आग्नेय कोपर्‍यात (दक्षिण-पूर्व) गॅस ठेवून तेथेच स्वयंपाक बनवला पाहिजे।
* जड वस्तू उदा। धान्याच्या कोठ्या, मोठी भांडी, लोखंडाच्या जाड वस्तू, रिकामे किंवा भरलेले गॅसचे सिलेंडर, कपाटे, इत्यादी वस्तू पूर्व, उत्तर, ईशान्य कोपर्‍यात ठेवलेल्या असतील तर त्या उचलून नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे.
* तिजोरी, कपाट किंवा पुस्तकांच्या कपाटाखाली लोखंड किंवा दगडाचे टेकण लावले असेल तर ते काढून लाकडी टेकण लावायला हवे।
* तिजोरी नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायला पाहिजे।
* घरात शयनकक्ष वास्तुच्या अनुरूप नसल्यास व त्याला बदलणेही शक्य नसल्यास अविवाहित मुलींनी उत्तर दिशेकडे झोपायला हवे आणि विवाहित जोडप्यांनी पूर्व दिशेच्या शयनकक्षात झोपणे टाळावे।
* ड्रेसिंग रूम नैऋत्य कोपर्‍यात नसेल तर वस्त्र बदलताना नेहमी तोंड उत्तरेकडे असायला हवे।
* घरात आग्नेय, वायव्य, नैऋत्य कोपर्‍यात आणि दक्षिण दिशेला नळ असतील आणि नळाची पाईपलाइनसुद्धा त्याच दिशेत असेल तर घराच्या पूर्व-उत्तर किंवा ईशान्य कोपर्‍यात पाण्याची टाकी बनवून घराच्या नळांमध्ये त्या टाकीतून पाण्याचा पुरवठा करावा।
* स्वयंपाकघर आग्नेय कोपर्‍यात अर्थात दक्षिण-पूर्वच्या कोपर्‍यात नसेल तर दिवसा आणि संध्याकाळी या दिशेला एक दिवा जरूर लावावा.

सुचना:-

देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे:-
* पादत्राणे देवळाच्या बाहेर शक्यतो आपल्या डाव्या बाजूस काढावीत.* पाय धुण्याची सोय असल्यास पाय धुऊन 'अपवित्र: पवित्रो वा', असे म्हणत स्वत:वर तीनदा पाणी शिंपडावे.* देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.* देवळाकडे जाताना हात नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत.* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या वर लावावा: * देवळात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराला नमस्कार करावा.* देवळात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने गाभाऱ्यापर्यंत चालत जावे (व परतताना उजव्या बाजूने बाहेर पडावे.)

देवतेचे दर्शन कसे घ्यावे?
* देवळातील घंटा अतिशय हळू आवाजात वाजवावी।* देवतेची मूर्ती व तिच्या समोर असलेली कासवाची (शिवाच्या देवळात नंदीची) प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता, प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे।* आधी देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे। नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे व शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे।* देवतेला अर्पण करावयाची वस्तू (उदा। फुले) देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी. मूर्ती दूर असेल, तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी.

प्रदक्षिणा:-* प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी।* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात।* प्रदक्षिणा घालत असताना गाभाऱ्याला स्पर्श करू नये।* प्रदक्षिणा घालत असताना देवतेच्या पाठीमागच्या बाजूस आल्यावर थांबून, देवतेला नमस्कार करावा।* शक्यतो देवांना सम संख्येने (उदा। 2,4) व देवींना विषम संख्येने (उदा. 1,3) प्रदक्षिणा घालाव्यात.*प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर थांबून, देवतेला नमस्कार करून मगच पुढील प्रदक्षिणा घालावी.

प्रदक्षिणेनंतर काय करावे:-
* देवतेला शरणागतभावाने नमस्कार व प्रार्थना करावी.
* उजव्या हातात तीर्थ घेऊन ते प्राशन केल्यावर त्याच हाताचे मधले बोट व अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत व कपाळावरून डोक्यावर वरच्या दिशेने फिरवतीत.
* प्रसाद घेण्यासाठी नम्रतेने थोडे वाकावे.
* देवळात बसून प्रथम थोडा वेळ नामजप करावा व मग प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा.
* निघताना देवतेला पुन्हा प्रार्थना करावी. देवळाबाहेर पडल्यावर आवारातून कळसाला नमस्कार करावा.

देवीची ओटी कशी भरावी:-
* देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य आहे.
* ताटात साडी ठेवून साडीवर थोडे तांदूळ, खण व नारळ ठेवावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. हे सर्व साहित्य हातांच्या ओंजळीत घ्यावे आणि ओंजळ छातीसमोर धरून शरणागतभावाने देवीसमोर उभे राहावे.
'देवीकडून चैतन्य मिळू दे, तसेच आपली आध्यात्मिक उन्नती होऊ दे',
अशी भावपूर्ण प्रार्थना करून ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे. नंतर या साहित्यावर थोडे तांदूळ वाहावेत.

यशस्वी जीवनाची सुत्रे ...

१) नेहमी सुर्योदयापूर्वी दीड ते दोन तास उठा।
२) उठल्यानंतर परमेश्वराचे स्मरण करुन, आपल्या तळाहाताचे दर्शन घेत कराग्रे वसते ॥ हा श्लोक म्हणा।
३) रोज सकाळी किमान अर्धा ते एक तास व्यायाम करा। (सूर्यनमस्कार व बैठका/ दोरीउड्या)
४) नियमितपणे योग्य आहारच घ्या।
५) आपले रोजचे काम, कर्तव्य नियमितपणे पूर्ण करा। आजचे काम कधीही उद्यावर ढकलू नका.
६) आपले शरीर, आपला पोशाख, आपल्या वस्तू नीटनेटक्या व स्वच्छ ठेवा।
७) एकावेळी एकच काम एकाग्रतेने व नीटनेटके करा।
८) चांगले ऎका, चांगले बघा, चांगले बोला व चांगलेच करा। यशस्वी जीवनाची ही चतु:सूत्री आहे.
९) धर्म, जात, गरीब -श्रीमंत असे कुठल्याही प्रकारचे भेद मानू नका। प्रत्येकाशी प्रेमाने नातं जोडा.
१०) दिलेली वेळ नेहमी पाळायला शिका तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील।
११) अडचणीत असणाऱ्या प्रत्येकाला शक्य ती मदत करा।
१२) रोज किमान कोणतेही एक वृत्तपत्र संपूर्ण वाचा।
१३) अतिथी वा कोणीही आल्यास त्याच्याशी प्रेमाने संवाद साधा, त्यांना पाणी वगैरे द्या, त्यांची विचारपूस करा।
१४) थोर महापुरुषांची चरित्रे वाचा। ती तुम्हाला प्रेरणा देतील.
१५) अंगणात, कुंडीत एखादे झाड लावा व त्याला नियमितपणे पाणी घालून त्याची काळजी घ्या।
१६) वर्षातून एकदा तरी सहलीला अवश्य जा।
१७) आपल्या मित्रांचे वाढदिवस एखाद्या अहीत अथवा डायरीत लिहून ठेवा व त्यांच्या वाढदिवशी त्यांना गुलाबाचे फ़ूल भेट द्या।
१८) चांगल्या सुविचारांचा, गाण्यांचा, चित्रांचा, फ़ोटोंचा, कवितांचा, कथांचा पुस्तकांचा संग्रह करा।
१९) शाळेतल्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्या व यशासाठी प्रयत्न करा।
२०) आपल्या आवडत्या लेखकांचे, गायकांचे, माणसांचे पत्ते मिळवा व त्यांच्याशी पत्रमैत्री करा।
२१) एखाद्या कवितांचा, गाण्यांचा, नाटकाचा असा कोणताही कार्यक्रम पाहण्याची संधी लाभली तर ती दवडू नका।
२२) आपला पुस्तकसंग्रह वाढवा व स्वत:चं असं एक लघुग्रंथालय विकसित करा।
२३) दररोज किमान दोन पाने अवांतर लेखन करा। उद. रोजनिशी लिहिणे, निबंध लिहिणे इ.
२४) आपला एखादा मित्र, मैत्रीण, नातेवाईक आजारी असल्यास त्याला अवश्य भेटायला जा। तुमच्या भेटीने तो सुखावेल.
२५) कोणतीही कला तिच्या सर्व रंगसगांसहीत शिकण्याचा प्रयत्न करा। उदा. वादन, गायन, नृत्य, अभिनय, लेखन, वक्तृत्व इ.
२६) महिन्यातून किमान एकदा तरी आपल्या नजीकच्या पुस्तक प्रदर्शनाला आवश्य भेट द्या आणि शक्य आसल्यास आवडती पुस्तकं विकत घ्या।
२७) एखाद्या ग्रंथसंग्रालयाचे सभासद व्हा आणि आवडती पुस्तके वाचून काढा।
२८) नियमितपणे प्रात:प्रार्थना, भोजनश्लोक आणि सायंप्रार्थना म्हणण्यास चुकू नका।
२९) दिनचर्या आचरणात आणण्यास दिरंगाई करु नका।
३०) तुमच्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा काय आहे याचा विचार करा।
३१) आयुष्यात कधीही निराश होऊ नका; परमेश्वरावर विश्वास ठेवा.

सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व:-

शास्त्रात पूजा करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे.सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्य किरणे परत येत नाहीत. आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची ‍किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांचे बुबळे काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणार्‍या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. वैज्ञानिकांनी हे सिध्द केले आहे की सूर्य किरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अदभूत रोगनाशक शक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्य किरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक ‍विषाणूंचा नाश करतो. टिबीचे विषाणू उकळणार्‍या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरीत नष्ट होतात. यावरूनच सूर्य किरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुध्द हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रीय होते. सूर्य किरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च (यजुर्वेद 7/42)। या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थांचा आत्मा समजले जाते. जीवेत शरदः शतम्‌ (यजुर्वेद 36/24) पासून शंभर वर्ष जगण्याची, शंभर वर्ष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थना सुध्दा सूर्यालाच केली जाते. एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की जर सूर्यापासून मिळणारा उब आमच्यात सुरक्षित रहात असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही उब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपाने आवश्यक आहे.

शनीच्या उपासना:-


शनिदेवाचा जन्म वैशाख अमावास्याच्या दिवशी दिवसा 12 वाजता झाला होता, म्हणूनच वैशाख अमावास्या शनैश्चर जयंती स्वरूपात साजरी केली जाते. शनि मकर आणि कुंभाचा स्वामी आहे व याची महादशा 19 वर्षाची असते। शनिचे अधिदेवता प्रजापिता ब्रह्मा आणि प्रत्यधिदेवता राम आहे। यांचा वर्ण कृष्ण, वाहन घुबड व रथ लोखंडाने बनलेले आहे. हा प्रत्येक राशीत तीस तीस महिने राहतो. शनि देव हे सूर्य आणि छाया (संवर्णा)चे पुत्र आहे. शनिदेवा विषयी अनेक गैरसमज प्रचलित असले तरी चांगले करणार्‍यांच्या सतत पाठीशी आणि वाईट करण्यार्‍यांवर शनिदेवाचा कोप होतो असे मानले जाते।
शनीच्या उपासनेसाठी मंत्र :-शनीची उपासनांसाठी खाली दिलेल्या एक मंत्र किंवा सर्वांचेच श्राद्धानुसार नियमित जप केले पाहिजे. जपाची वेळ संध्याकाळ तथा ऐकून जप संख्या २३००० असायला पाहिजे.शनी देवतेचे किंवा मारुती उपासना, दर्शन करावे.तीळ तेल व सेँदूर,रुईची माळ घालावी।
पौराणिक मंत्र:-
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्‌।
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामी शनैश्चरम्‌॥
सामान्य मंत्र:-
शं शनैश्चराय नमः।

कालसर्प


कालसर्प :- काळ या शब्दाचा अर्थ मृत्यू नव्हे. तसेच कालसर्प हा योग आहे, दोष नाही, हे प्रथम लक्षात घ्यावे. एकूण 12 प्रकारचे विशेष योग असतात. या योगाच्या अनेक सकारात्मक बाजूही आहे. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्या मध्ये येतात तेव्हा त्याला कालासर्प योग म्हटले जाते.

आदी शंकराचार्य


सात वर्षाचा एक संन्यासी मुलगा गुरुआज्ञेनुसार भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या ब्राह्मणाच्या घरात धान्याचा दाणासुद्धा नव्हता. ब्राह्मणाच्या पत्नीने मुलाच्या हातावर आवळा ठेवला आणि आपण काहीच भिक्षा देऊ शकत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. ब्राह्मणाची हलाखीची स्थिती पाहून कळवळलेल्या त्या मुलाने तिथल्या तिथे लक्ष्मीचे स्तोत्र रचून तिला त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करण्याची विनंती केली. लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने त्या निर्धन ब्राह्मणाच्या घरी सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला. जगतजननी लक्ष्मीला प्रसन्न करून त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करणारा तो संन्यासी मुलगा पुढे जाऊन आदि शंकराचार्य या नावाने विख्यात झाला. शंकराचार्यांच्या रूपाने खुद्द भगवान शंकर जन्माला आले आहेत, असे मानले जाते. केरळमधील कालाडी गावात रहाणार्‍या शंकराचार्याच्या वडिलांना-शिवगुरू नामपुद्री - यांना लग्नानंतर बरीच वर्षे झाली तरी मूल होत नव्हते. त्यावेळी नाममुद्री यांची पत्नी विशिष्टादेवी यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा धरून शंकराची आराधना करायला सुरवात केली. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विशिष्टादेवींनी स्वप्नात दर्शन दिले. विशिष्टादेवींनी त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी असा वर मागितला. त्यावर शंकर म्हणाले, ''हे बघ मी तुला पुत्र देतो. पण विद्वान पुत्र मागितलास तर तो जास्त काळ जगणार नाही आणि विद्वान नसलेला पुत्र दीर्घकाळ जगेल. बोल तुला कोणता पुत्र हवा?'' त्यावर विशिष्टादेवींनी विद्वान पुत्राची मागणी केली. शंकर तथास्तु म्हणाले आणि या पुत्राच्या रूपाने आपणच तुझ्या पोटी जन्म घेणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर काही काळाने इसवी सन ६८६ मध्ये वैशाख शुक्ल पंचमीला (काहींच्या मते अक्षय्यतृतीयेला) मध्यानकाली विशिष्टादेवींनी तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याच्या शरीरावर जन्मतः असलेल्या खुणा पाहून हा शंकराचा अवतार असल्याची सगळ्यांचीच खात्री पटली. म्हणून त्याचे नाव शंकर ठेवण्यात आले.''हे बघ मी तुला पुत्र देतो. पण विद्वान पुत्र मागितलास तर तो जास्त काळ जगणार नाही आणि विद्वान नसलेला पुत्र दीर्घकाळ जगेल. बोल तुला कोणता पुत्र हवा?''शंकराचार्यांचा जन्म झाला तो काळ मोठा कठीण होता. भारतात वैदिक धर्माला ग्लानी आली होती. शंकराचार्यांच्या रूपाने एक तेजस्वी शलाका या अंधकारमय जगाला भेदत आली आणि तिने आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने जगाला उजळून टाकले. वयाच्या तिसर्‍या वर्षापर्यंत छोटा शंकर मल्ल्याळम शिकला होता. त्याने संस्कृत शिकावे अशी पित्याची इच्छा होती. पण पित्याचा अकाली मृत्यू झाल्याने संसाराची सारी जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. या माउलीने छोट्या शंकराला काहीही कमी पडू दिले नाही. पाच वर्षापर्यंत त्याची मुंज करून त्याला गुरूगृही धाडले. तिथे गेल्यावर छोट्या शंकराच्या अफाट प्रतिभेने गुरूही चकित झाले. अवघ्या दोन वर्षात या मुलाने वेद, पुराण, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी ग्रंथ कंठस्थ करून सगळ्यांना विस्मयचकित करून टाकले. गुरुंची सेवा करून घरी परतल्यानंतर ते मातेची सेवा करू लागले. त्याची मातृभक्ती मोठी विलक्षण होती. या माउलीला कालाडीपासून दूर असलेल्या आलवाई (पूर्णा) नदीत स्नान करण्याची इच्छा होती. शंकरने या नदीची प्रार्थना करून तिचा प्रवाह आपल्या गावाजवळ आणला आणि मातेची इच्छा पूर्ण केली. काही दिवसांनंतर शंकरचा विवाह करण्याचे त्याच्या आईच्या मनात घाटू लागले. पण त्यांना हे सगळे नको होते. त्याचवेळी एका ज्योतिषाने शंकरची पत्रिका पाहून हा मुलगा अल्पायुषी असेल असे सांगितले. त्यावर मग संन्यास घेण्याची शंकराची इच्छा आणखी प्रबळ झाली. संन्यास घेण्यासाठी त्याने आईजवळ हट्ट धरला अखेर मातेलाही त्याच्या या हट्टापुढे मान तुकवावी लागली. वयाच्या सातव्या वर्षी संन्यास घेऊन हे बालक देशभ्रमणासाठी निघाले. भ्रमण करताना ते नर्मदेच्या किनारी ओंकारनाथला आले. तेथे एक गुरू गोविंदपाद हे महायोगी अनेक वर्षांपासून तपश्चर्या करत असल्याचे शंकरार्यांच्या कानावर आले. त्यांच्याकडून शंकराचार्यांनी अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त केले. त्यानंतर गुरू आज्ञेने ते काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. वाटेत एका चांडाळाने त्यांची वाट रोखून धरली. त्या चांडाळाने त्यांना सांगितले, की तुमच्या शरीरात असलेल्या परमात्म्याची तुम्ही उपेक्षा करत आहात. त्यामुळे तुम्ही अब्राह्मण ठरता. त्यामुळे तुम्ही माझ्या मार्गातून दूर व्हा.'' चांडाळाच्या मुखातून देववाणी ऐकल्यानंतर, तुम्ही मला ज्ञान दिले म्हणजे आता तुम्ही माझे गुरू झाले आहात, असे सांगून शंकराचार्यांनी त्याला नमस्कार केला. त्यावेळी त्यांना चांडाळाच्या जागी त्यांना शिवाचे व चार देवांचे दर्शन झाले. काशीत राहिल्यानंतर शंकराचार्य महिष्मती नगरातील आचार्य मंडनमिश्र यांना भेटायला गेले. आचार्यांच्या घरात असलेली मैनासु्द्धा वेदमंत्र म्हणायची अशी ख्याती होती. शंकराचार्यांनी मंडनमिश्रांशी झालेल्या वादात त्यांचा पराभव केला. मंडनमिश्राचा पराभव होत असल्याचे पाहून त्यांची पत्नी शारदादेवी शंकराचार्यांना म्हणाली, की आपण माझ्या अर्ध्या अंगाचा पराभव केला आहे. माझा पराभव करून दाखवा तर तुम्ही खरे विजेते ठराल.शंकराचार्य संन्यासी होते, हे हेरून शारदादेवींनी त्यांना कामशास्त्रावर आधारीत प्रश्न विचारले. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची अडचण झाली. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी काही अवधी मागितला. त्यानंतर मग परकाया प्रवेश करून त्यांनी यासंदर्भातील सगळी माहिती जाणून घेतली. त्यानंतर मग त्यांनी शारदादेवींनाही वादात हरवले. काशीत असताना त्यांना बड्या विद्वानांना वादात हरविले. गुरूगृही आल्यानंतर अनेकांनी मग त्यांच्या हातून दीक्षा घेतली. यानंतर शंकराचार्यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार हेच व्रत हाती घेतले. अनेक ग्रंथ रचले. अद्वैत ब्रह्मवादी शंकराचार्य निर्विशेष ब्रह्मालाच सत्य मानत होते. ब्रह्मज्ञानात ते कायम निमग्न असत. एकदा ब्राह्ममुहूर्तावर ते स्नानासाठी मणिकर्णिका घाटावर जात होते. पण ते जात असलेली गल्ली अतिशय छोटी होती. त्या गल्लीतच एक स्त्री पतीच्या शवाचे डोके मांडीवर घेऊन विलाप करत होती. त्यावेळी आचार्यांच्या शिष्यांनी तिला बाजूला होण्याची विनंती केली. पण ती बाजूला झाली नाही. मग शंकराचार्यांनी स्वतःच तिला विनंती केली. त्यावेळी ती स्त्री म्हणाली, की 'आपण मला वारंवार हे शव बाजूला घेण्याची विनंती करत आहात. मग तुम्हीच या प्रेताला बाजूला व्हायला का सांगत नाही.' त्यावेळी हे प्रेत आहे. जिवंत माणूस नाही. हे शंकराचार्यांनी तिच्या लक्षात आणून दिले. पण मग त्या स्त्रीने त्यांना अडचणीत टाकणारा सवाल केला. 'हे महात्मा, शक्तीनिरपेक्ष सत्य हेच जगाचे कर्ता धर्ता आहे. मग शक्ती न लावताही हे शव का हटवले जाऊ शकत नाही'. या सवालावर आचार्यांना ही बाई साधीसुधी नाही हे लक्षात आले. समाधी लावल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की ही बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आदिमाया आहे. मग त्यांच्या तोंडातून आपोआप मातृवंदनेचे स्तोत्र बाहेर पडू लागले. आता शंकराचार्यांचे स्थान खूपच मोठे झाले होते. त्यांच्या ज्ञानाचा सागर रूंदावत गेला. त्यात अद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, निर्गुण ब्रह्मज्ञानाबरोबरच सगुण साकार रूपाची आराधनाही एकाचवेळी होती. ज्ञानाच्या अद्वैत भूमीवर निर्गुण निराकार ब्रह्म आहे. तेच ब्रह्म द्वैताच्या भूमीवर मात्र सगुण साकार रूपात आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी निर्गुण व सगुण दोन्हीचे समर्थन करून निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी सगुणाच्या शिडीचा वापर करणे अपरिहार्य असल्याचे मत मांडले. ज्ञान व भक्तीच्या मीलनाच्या भूमीवर अद्वैत ज्ञान हेच शेवटी लक्ष्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी 'ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या' असे सांगितले. शिव, पार्वती, गणेश, विष्णू यांची भक्तिरसात ओथंबलेली स्तोत्रे रचली. सौंदर्य लहरी, विवेक चूडामणी असे महान ग्रंथ रचले. शिवाय प्रस्तान त्रयीवर भाष्यही लिहिले. शैव-वैष्णवांमधील भांडणाची समाप्ती त्यांनी घडवून आणली. पंचदेवोपासनेची प्रथा पाडली. संपूर्ण भारताचा प्रवास करून देशाच्या चार दिशांना चार आश्रमांची स्थापना केली. संपूर्ण देशाला एका सांस्कृतिक, धार्मिक, दार्शनिक, आध्यात्मिक व भौगोलिक एकतेच्या सूत्रात बांधले. आयुष्याचे प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी नश्वर देह सोडून ते परमात्म्यात लीन झाले.

श्रीराम



भारतीय संस्कृतीत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून श्रीरामाकडे पाहिले जाते. 'मर्यादा पुरूषोत्तम' हे विशेषण त्यामुळेच श्रीरामाला दिले जाते. श्रीरामाला भगवान विष्णूचा सातवा अवतार मानतात. आयोध्याचा राजा दशरथ व कौसल्या यांचा राम थोरला मुलगा. त्याला लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न हे तीन सावत्र भाऊ होते. जनक राजाची कन्या सीता त्याची पत्नी. दशरथ राजाची पट्टराणी कैकयीने आपला मुलगा भरत याला आयोध्येचे राज्य मिळावे यासाठी रामाला १४ वर्षे वनवासात पाठवले. ही १४ वर्षे रामाने पत्नी सीता व धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्याबरोबर घालवली. या काळात त्याने जंगलातील ऋषींना त्रास देणारया अनेक असूरांचा वध केला. रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेत बंदिवासात ठेवले. तेव्हा तिला सोडवण्यासाठी व रावणाचा वध करण्यासाठी राम लंकेत गेला. या काळात रामाला हनुमान भेटला. हनुमानाच्या वानरसेनेची मदत घेऊन त्यांनी लंकेवर आक्रमण केले व रावणाचा वध केला. सीतेची सुटका केली. वनवास भोगल्यावर श्रीरामाचे पुन्हा अयोध्येत आगमन झाले. गुढ्या उभारून लोकांनी त्याचे स्वागत केले. त्यामुळे तो दिवस गुडीपाडवा म्हणून साजरा केला जातो. या काळत सर्वत्र आनंद, शांती, भरभराट होती. श्रीरामाच्या जीवनावर वा‍ल्मिकी ऋषिंनी रामायण हे महाकाव्य लिहिले.

श्रीगुरूदेव दत्त



दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीच्या विकासातील एक अद्बूत निर्मिती आहे. शैव, वैष्णव व शाक्त या तीनही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा दत्तात्रेयाचा प्रभाव गेली हजार बाराशे वर्ष भारतात विशेषतः महाराष्ट्रात गाजत आहे. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत, किंबहुना धर्मातीत आहे. महानुभावसंप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायात दत्तात्रेयाविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. तसेच खास दत्तभक्तीची परंपरा चालविणारा दत्तसंप्रदायही गेली पाचशे वर्ष महाराष्ट्रात नांदत आहे. या संप्रदायात दत्तात्रेयाला श्रद्धेय मानणाऱ्या उपासकांत हिंदूंबरोबर मुसलमानही आहेत. भारतीय संस्कृतीत वेदांतील इंद्र ही वीरदेवता आहे, तर मध्ययुगातील दत्त ही सिद्धदेवता आहे. दत्तात्रेय ही देवता भारतीयांच्या प्रगल्भ चिंतनाची निर्मिती आहे. भारतीय संस्कृतीतीत अत्यंत परिणत विचार आणि निगूढ भावना व्यक्त करण्यासाठी इतिहासाच्या गर्भातून हे अद्भूत प्रतीक जन्म पावले आहे. त्यात समग्रता आणि सामंजस्य असल्याने ते सार्वत्रिक श्रद्धेचा विषय बनले आहे. दत्त चरित्र हे सगुण साकार ईश्वरावताराचे नसून चिरंतन मुल्यांच्या विकास प्रक्रियेचे आहे आणि म्हणूनच दत्तात्रयेची उपासना ही सर्वोच्च जीवन मुल्याची साधना आहे. या देवतेच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे. त्यांच्या अवतारानंतर महाराष्ट्रात खास दत्तोपासनेचा संप्रदाय निर्माण झाला आणि औदूंबर, वाडी व गाणगापूर ही त्या संप्रदायाची प्रधान तीर्थस्थाने बनली. श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारातून जो दत्तोपासनेचा प्रवाह प्रवर्तित झाला. त्या प्रवाहाशिवाय दत्तोपासनेच्या क्षेत्रात अन्य प्रवाहही नांदत राहिले. परंतु, त्यांचे प्रवाह व्यापक नसल्याने ते वैयक्तिक उपासनेपुरतेच मर्यादित राहिले. त्यांना संप्रदायाचे स्वरूप आले नाही. आज ज्याला आपण दत्त संप्रदाय म्हणून ओळखतो, तो प्रवाह श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतार कार्यातून प्रकटला आहे. दत्त संप्रदायाचे उपास्य असलेला दत्तात्रेय हा गुरूदेव आहे. त्याची उपासना गुरूस्वरूपातच करायची असते. श्रीगुरू किंवा गुरूदेव दत्त हा त्याचा जयघोष आहे. त्याचमुळे गुरूसंस्थेला प्राधान्य असलेल्या सर्व साधनप्रणालीत दत्तात्रेयाची पुज्यता रूढ झाली. परमार्थात गुरूसंस्थेचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. विकल्पविकारांचे तिमिर दूर सारून यथार्थज्ञानाचा प्रकाश दाखविण्यासाठी सद्गुरूची नितांत आवश्यक्ता असते. दत्तात्रेय हा परमगुरू असल्याने पथदर्शक गुरू आणि गुरूच्या मार्गदर्शनामुळे होणारी परमप्राप्ती हे दोन्ही विशेष त्याच्या स्वरूपात सामावले आहेत. दत्त संप्रदायात सगुणध्यानासाठी जरी दत्तात्रेयांचे सालंकृत सगुणरूप वापरले जात असले तरी पूजोपचारासाठी मूर्तीऐवजी पादुकांचे स्वरूप विशेष मानले जाते. औदुंबर, वाडी व गाणगापूर या तीनही ठिकाणी दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गुरूचरित्र, दत्तप्रबोध, दत्तमहात्म्य आणि गुरूलीलामृत हे ग्रंथ दत्त संप्रदायात विशेष मान्यता पावलेले आहेत.


विष्णूचा अवतार- श्री दत्तात्रय :-
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'अत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा.
श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.

श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

दत्तोपासनेतील सर्वोच्च स्थान-गाणगापूर:-
हे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे. श्रीनरसिंह सरस्वती येथे वाडीहून आले आणि सुमारें तेवीस वर्षे येथें राहून येथूनच श्रीशैलाकडे त्यांनी गमन केले. त्यांच्या दोन तपाएवढ्या प्रदीर्घ सन्निध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावलें आहे. श्रीगुरु जेव्हां येथे आले, तेव्हा प्रथम ते संगमरावरच राहत. नंतर ते गांवांत बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत.

वाडीच्या पादुकांना 'मनोहर पादुका' म्हणतात, तर तेथील पादुकांना 'निर्गुण पादुका' अशी संज्ञा आहे. जणू वाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ति कळसास पोचली होती - 'मनोहर बनली होती, तर येथें ते देहातीत- गुणरुपातीत होऊन 'निर्गुण' स्वरूप पावले होते. गुरूवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील 'निर्गुण पादुका' चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत 'उदक' सोडतात.

पादुका असलेला मठ गांवाच्या मध्यभागी आहे. मठाच्या पूर्वेस महादेवाचें स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव-पार्वती यांच्या मूर्ती ‍आहेत, पश्चिमेस अश्वत्थानचें झाड आहे. अश्वत्थाच्या पराभोंवती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशीवृंदावन आहे. मठांतील पादुकांच्या गाभार्‍याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीनें मढविलेला लहानसा झरोका आहे. या झरोक्यांतून दर्शनार्थींनी श्रीगुरूंच्या त्या चिरस्मरणीय 'निर्गुण पादुकां'चे दर्शन घ्यावयाचें असतें. अनेक साधकांना या पादुकांच्या ठायींच श्रीगुरूंचें दिव्य दर्शन झालें, असें सांगतात.

गावापासून एक मैल अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे. संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढें श्रीगुरूंची तपोभूती आहे. गाणगापूरच्या परिसरांत षट्‍कुलतीर्थ, नरसिंहतीर्थ, भागीरथीतीर्थ, पापविनाशीतीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत.

गाणगापूरच्या उत्सव-संभारांत दत्तजयंती आरि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्व आहे. श्रीगुरूंचें सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेंच घडलें आणि आपल्या दिव्योदात्त विभूतिमत्त्वाचें सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूंत संक्रमित केलें. त्याचमुळें गेली पांच शतकें हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयांत असीम श्रद्धेचा विषय बनले आहे.

(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)