I made this widget at MyFlashFetish.com.

Thursday, February 5, 2009

वास्तुशास्त्राचे नियम:-

प्राचीन ऋषी-मुनी व शिल्पकार यांनी वास्तुपुरुषाची स्थिती लक्षात ठेवून वास्तु रचना करण्याचे निर्देश दिले आहेत। वास्तू देवतेच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी या निर्देशांचे पालन केले पाहिजे. या शास्‍त्रांच्या विपरित वास्तु बांधल्यास तीथ रहाणार्‍यांना त्रास होतो. अशावेळी घरात जे वास्तु संमत नाही त्यात बदल करून ती वास्तु रहाण्यास अनुकूल बनवू शकता. त्यासाठी खालील उपाय करा. (वास्तुशांति करून घेणे.)
*घरापुढे, मागे, आजूबाजूला खड्डा असेल तर तो लवकरात लवकर भरा।
* घरासमोर कचर्‍याचा ढिगारा असेल, न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल व घाण पाणी साठले असेल तर ते लगेचच साफ करायला हवे। घरासमोर स्वच्छ जागा असणे चांगले।
* किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे नसेल तर आणि ती जागा बदलणे शक्य नसले तर जेवण करताना तोंड उत्तर, पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे।
* घरातील नैऋत्य कोपरा (दक्षिण-पश्चिम) कधीही रिकामा ठेवू नये। तेथे वजनदार सामान ठेवले पाहिजे.
* घरात पाणी साठवण्याचे स्थान उत्तर, पूर्व किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व कोपरा) दिशेला असेल तर ईशान्य कोपर्‍यातच जमिनीच्या आत पाण्याची लहानशी टाकी बनवावी आणि पाणी पिताना तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेत असायला पाहिजे।
* ईशान्य कोपर्‍यात स्वयंपाकघर, बेडरूम किंवा स्टोअर रूम असेल तर ती जागा तातडीने रिकामी करावी। तिथे देवाचे चित्र लावून पूजाअर्चना करा.
* स्वयंपाकघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल आणि ते बदलणे शक्य नसेल तर आग्नेय कोपर्‍यात (दक्षिण-पूर्व) गॅस ठेवून तेथेच स्वयंपाक बनवला पाहिजे।
* जड वस्तू उदा। धान्याच्या कोठ्या, मोठी भांडी, लोखंडाच्या जाड वस्तू, रिकामे किंवा भरलेले गॅसचे सिलेंडर, कपाटे, इत्यादी वस्तू पूर्व, उत्तर, ईशान्य कोपर्‍यात ठेवलेल्या असतील तर त्या उचलून नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे.
* तिजोरी, कपाट किंवा पुस्तकांच्या कपाटाखाली लोखंड किंवा दगडाचे टेकण लावले असेल तर ते काढून लाकडी टेकण लावायला हवे।
* तिजोरी नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायला पाहिजे।
* घरात शयनकक्ष वास्तुच्या अनुरूप नसल्यास व त्याला बदलणेही शक्य नसल्यास अविवाहित मुलींनी उत्तर दिशेकडे झोपायला हवे आणि विवाहित जोडप्यांनी पूर्व दिशेच्या शयनकक्षात झोपणे टाळावे।
* ड्रेसिंग रूम नैऋत्य कोपर्‍यात नसेल तर वस्त्र बदलताना नेहमी तोंड उत्तरेकडे असायला हवे।
* घरात आग्नेय, वायव्य, नैऋत्य कोपर्‍यात आणि दक्षिण दिशेला नळ असतील आणि नळाची पाईपलाइनसुद्धा त्याच दिशेत असेल तर घराच्या पूर्व-उत्तर किंवा ईशान्य कोपर्‍यात पाण्याची टाकी बनवून घराच्या नळांमध्ये त्या टाकीतून पाण्याचा पुरवठा करावा।
* स्वयंपाकघर आग्नेय कोपर्‍यात अर्थात दक्षिण-पूर्वच्या कोपर्‍यात नसेल तर दिवसा आणि संध्याकाळी या दिशेला एक दिवा जरूर लावावा.

सुचना:-

देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे:-
* पादत्राणे देवळाच्या बाहेर शक्यतो आपल्या डाव्या बाजूस काढावीत.* पाय धुण्याची सोय असल्यास पाय धुऊन 'अपवित्र: पवित्रो वा', असे म्हणत स्वत:वर तीनदा पाणी शिंपडावे.* देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.* देवळाकडे जाताना हात नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत.* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या वर लावावा: * देवळात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराला नमस्कार करावा.* देवळात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने गाभाऱ्यापर्यंत चालत जावे (व परतताना उजव्या बाजूने बाहेर पडावे.)

देवतेचे दर्शन कसे घ्यावे?
* देवळातील घंटा अतिशय हळू आवाजात वाजवावी।* देवतेची मूर्ती व तिच्या समोर असलेली कासवाची (शिवाच्या देवळात नंदीची) प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता, प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे।* आधी देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे। नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे व शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे।* देवतेला अर्पण करावयाची वस्तू (उदा। फुले) देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी. मूर्ती दूर असेल, तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी.

प्रदक्षिणा:-* प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी।* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात।* प्रदक्षिणा घालत असताना गाभाऱ्याला स्पर्श करू नये।* प्रदक्षिणा घालत असताना देवतेच्या पाठीमागच्या बाजूस आल्यावर थांबून, देवतेला नमस्कार करावा।* शक्यतो देवांना सम संख्येने (उदा। 2,4) व देवींना विषम संख्येने (उदा. 1,3) प्रदक्षिणा घालाव्यात.*प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर थांबून, देवतेला नमस्कार करून मगच पुढील प्रदक्षिणा घालावी.

प्रदक्षिणेनंतर काय करावे:-
* देवतेला शरणागतभावाने नमस्कार व प्रार्थना करावी.
* उजव्या हातात तीर्थ घेऊन ते प्राशन केल्यावर त्याच हाताचे मधले बोट व अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत व कपाळावरून डोक्यावर वरच्या दिशेने फिरवतीत.
* प्रसाद घेण्यासाठी नम्रतेने थोडे वाकावे.
* देवळात बसून प्रथम थोडा वेळ नामजप करावा व मग प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा.
* निघताना देवतेला पुन्हा प्रार्थना करावी. देवळाबाहेर पडल्यावर आवारातून कळसाला नमस्कार करावा.

देवीची ओटी कशी भरावी:-
* देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य आहे.
* ताटात साडी ठेवून साडीवर थोडे तांदूळ, खण व नारळ ठेवावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. हे सर्व साहित्य हातांच्या ओंजळीत घ्यावे आणि ओंजळ छातीसमोर धरून शरणागतभावाने देवीसमोर उभे राहावे.
'देवीकडून चैतन्य मिळू दे, तसेच आपली आध्यात्मिक उन्नती होऊ दे',
अशी भावपूर्ण प्रार्थना करून ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे. नंतर या साहित्यावर थोडे तांदूळ वाहावेत.

यशस्वी जीवनाची सुत्रे ...

१) नेहमी सुर्योदयापूर्वी दीड ते दोन तास उठा।
२) उठल्यानंतर परमेश्वराचे स्मरण करुन, आपल्या तळाहाताचे दर्शन घेत कराग्रे वसते ॥ हा श्लोक म्हणा।
३) रोज सकाळी किमान अर्धा ते एक तास व्यायाम करा। (सूर्यनमस्कार व बैठका/ दोरीउड्या)
४) नियमितपणे योग्य आहारच घ्या।
५) आपले रोजचे काम, कर्तव्य नियमितपणे पूर्ण करा। आजचे काम कधीही उद्यावर ढकलू नका.
६) आपले शरीर, आपला पोशाख, आपल्या वस्तू नीटनेटक्या व स्वच्छ ठेवा।
७) एकावेळी एकच काम एकाग्रतेने व नीटनेटके करा।
८) चांगले ऎका, चांगले बघा, चांगले बोला व चांगलेच करा। यशस्वी जीवनाची ही चतु:सूत्री आहे.
९) धर्म, जात, गरीब -श्रीमंत असे कुठल्याही प्रकारचे भेद मानू नका। प्रत्येकाशी प्रेमाने नातं जोडा.
१०) दिलेली वेळ नेहमी पाळायला शिका तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील।
११) अडचणीत असणाऱ्या प्रत्येकाला शक्य ती मदत करा।
१२) रोज किमान कोणतेही एक वृत्तपत्र संपूर्ण वाचा।
१३) अतिथी वा कोणीही आल्यास त्याच्याशी प्रेमाने संवाद साधा, त्यांना पाणी वगैरे द्या, त्यांची विचारपूस करा।
१४) थोर महापुरुषांची चरित्रे वाचा। ती तुम्हाला प्रेरणा देतील.
१५) अंगणात, कुंडीत एखादे झाड लावा व त्याला नियमितपणे पाणी घालून त्याची काळजी घ्या।
१६) वर्षातून एकदा तरी सहलीला अवश्य जा।
१७) आपल्या मित्रांचे वाढदिवस एखाद्या अहीत अथवा डायरीत लिहून ठेवा व त्यांच्या वाढदिवशी त्यांना गुलाबाचे फ़ूल भेट द्या।
१८) चांगल्या सुविचारांचा, गाण्यांचा, चित्रांचा, फ़ोटोंचा, कवितांचा, कथांचा पुस्तकांचा संग्रह करा।
१९) शाळेतल्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्या व यशासाठी प्रयत्न करा।
२०) आपल्या आवडत्या लेखकांचे, गायकांचे, माणसांचे पत्ते मिळवा व त्यांच्याशी पत्रमैत्री करा।
२१) एखाद्या कवितांचा, गाण्यांचा, नाटकाचा असा कोणताही कार्यक्रम पाहण्याची संधी लाभली तर ती दवडू नका।
२२) आपला पुस्तकसंग्रह वाढवा व स्वत:चं असं एक लघुग्रंथालय विकसित करा।
२३) दररोज किमान दोन पाने अवांतर लेखन करा। उद. रोजनिशी लिहिणे, निबंध लिहिणे इ.
२४) आपला एखादा मित्र, मैत्रीण, नातेवाईक आजारी असल्यास त्याला अवश्य भेटायला जा। तुमच्या भेटीने तो सुखावेल.
२५) कोणतीही कला तिच्या सर्व रंगसगांसहीत शिकण्याचा प्रयत्न करा। उदा. वादन, गायन, नृत्य, अभिनय, लेखन, वक्तृत्व इ.
२६) महिन्यातून किमान एकदा तरी आपल्या नजीकच्या पुस्तक प्रदर्शनाला आवश्य भेट द्या आणि शक्य आसल्यास आवडती पुस्तकं विकत घ्या।
२७) एखाद्या ग्रंथसंग्रालयाचे सभासद व्हा आणि आवडती पुस्तके वाचून काढा।
२८) नियमितपणे प्रात:प्रार्थना, भोजनश्लोक आणि सायंप्रार्थना म्हणण्यास चुकू नका।
२९) दिनचर्या आचरणात आणण्यास दिरंगाई करु नका।
३०) तुमच्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा काय आहे याचा विचार करा।
३१) आयुष्यात कधीही निराश होऊ नका; परमेश्वरावर विश्वास ठेवा.

सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व:-

शास्त्रात पूजा करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे.सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्य किरणे परत येत नाहीत. आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची ‍किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांचे बुबळे काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणार्‍या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. वैज्ञानिकांनी हे सिध्द केले आहे की सूर्य किरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अदभूत रोगनाशक शक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्य किरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक ‍विषाणूंचा नाश करतो. टिबीचे विषाणू उकळणार्‍या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरीत नष्ट होतात. यावरूनच सूर्य किरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुध्द हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रीय होते. सूर्य किरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च (यजुर्वेद 7/42)। या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थांचा आत्मा समजले जाते. जीवेत शरदः शतम्‌ (यजुर्वेद 36/24) पासून शंभर वर्ष जगण्याची, शंभर वर्ष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थना सुध्दा सूर्यालाच केली जाते. एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की जर सूर्यापासून मिळणारा उब आमच्यात सुरक्षित रहात असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही उब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपाने आवश्यक आहे.

शनीच्या उपासना:-


शनिदेवाचा जन्म वैशाख अमावास्याच्या दिवशी दिवसा 12 वाजता झाला होता, म्हणूनच वैशाख अमावास्या शनैश्चर जयंती स्वरूपात साजरी केली जाते. शनि मकर आणि कुंभाचा स्वामी आहे व याची महादशा 19 वर्षाची असते। शनिचे अधिदेवता प्रजापिता ब्रह्मा आणि प्रत्यधिदेवता राम आहे। यांचा वर्ण कृष्ण, वाहन घुबड व रथ लोखंडाने बनलेले आहे. हा प्रत्येक राशीत तीस तीस महिने राहतो. शनि देव हे सूर्य आणि छाया (संवर्णा)चे पुत्र आहे. शनिदेवा विषयी अनेक गैरसमज प्रचलित असले तरी चांगले करणार्‍यांच्या सतत पाठीशी आणि वाईट करण्यार्‍यांवर शनिदेवाचा कोप होतो असे मानले जाते।
शनीच्या उपासनेसाठी मंत्र :-शनीची उपासनांसाठी खाली दिलेल्या एक मंत्र किंवा सर्वांचेच श्राद्धानुसार नियमित जप केले पाहिजे. जपाची वेळ संध्याकाळ तथा ऐकून जप संख्या २३००० असायला पाहिजे.शनी देवतेचे किंवा मारुती उपासना, दर्शन करावे.तीळ तेल व सेँदूर,रुईची माळ घालावी।
पौराणिक मंत्र:-
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्‌।
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामी शनैश्चरम्‌॥
सामान्य मंत्र:-
शं शनैश्चराय नमः।

कालसर्प


कालसर्प :- काळ या शब्दाचा अर्थ मृत्यू नव्हे. तसेच कालसर्प हा योग आहे, दोष नाही, हे प्रथम लक्षात घ्यावे. एकूण 12 प्रकारचे विशेष योग असतात. या योगाच्या अनेक सकारात्मक बाजूही आहे. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्या मध्ये येतात तेव्हा त्याला कालासर्प योग म्हटले जाते.

आदी शंकराचार्य


सात वर्षाचा एक संन्यासी मुलगा गुरुआज्ञेनुसार भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या ब्राह्मणाच्या घरात धान्याचा दाणासुद्धा नव्हता. ब्राह्मणाच्या पत्नीने मुलाच्या हातावर आवळा ठेवला आणि आपण काहीच भिक्षा देऊ शकत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. ब्राह्मणाची हलाखीची स्थिती पाहून कळवळलेल्या त्या मुलाने तिथल्या तिथे लक्ष्मीचे स्तोत्र रचून तिला त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करण्याची विनंती केली. लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने त्या निर्धन ब्राह्मणाच्या घरी सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला. जगतजननी लक्ष्मीला प्रसन्न करून त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करणारा तो संन्यासी मुलगा पुढे जाऊन आदि शंकराचार्य या नावाने विख्यात झाला. शंकराचार्यांच्या रूपाने खुद्द भगवान शंकर जन्माला आले आहेत, असे मानले जाते. केरळमधील कालाडी गावात रहाणार्‍या शंकराचार्याच्या वडिलांना-शिवगुरू नामपुद्री - यांना लग्नानंतर बरीच वर्षे झाली तरी मूल होत नव्हते. त्यावेळी नाममुद्री यांची पत्नी विशिष्टादेवी यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा धरून शंकराची आराधना करायला सुरवात केली. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विशिष्टादेवींनी स्वप्नात दर्शन दिले. विशिष्टादेवींनी त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी असा वर मागितला. त्यावर शंकर म्हणाले, ''हे बघ मी तुला पुत्र देतो. पण विद्वान पुत्र मागितलास तर तो जास्त काळ जगणार नाही आणि विद्वान नसलेला पुत्र दीर्घकाळ जगेल. बोल तुला कोणता पुत्र हवा?'' त्यावर विशिष्टादेवींनी विद्वान पुत्राची मागणी केली. शंकर तथास्तु म्हणाले आणि या पुत्राच्या रूपाने आपणच तुझ्या पोटी जन्म घेणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर काही काळाने इसवी सन ६८६ मध्ये वैशाख शुक्ल पंचमीला (काहींच्या मते अक्षय्यतृतीयेला) मध्यानकाली विशिष्टादेवींनी तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याच्या शरीरावर जन्मतः असलेल्या खुणा पाहून हा शंकराचा अवतार असल्याची सगळ्यांचीच खात्री पटली. म्हणून त्याचे नाव शंकर ठेवण्यात आले.''हे बघ मी तुला पुत्र देतो. पण विद्वान पुत्र मागितलास तर तो जास्त काळ जगणार नाही आणि विद्वान नसलेला पुत्र दीर्घकाळ जगेल. बोल तुला कोणता पुत्र हवा?''शंकराचार्यांचा जन्म झाला तो काळ मोठा कठीण होता. भारतात वैदिक धर्माला ग्लानी आली होती. शंकराचार्यांच्या रूपाने एक तेजस्वी शलाका या अंधकारमय जगाला भेदत आली आणि तिने आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने जगाला उजळून टाकले. वयाच्या तिसर्‍या वर्षापर्यंत छोटा शंकर मल्ल्याळम शिकला होता. त्याने संस्कृत शिकावे अशी पित्याची इच्छा होती. पण पित्याचा अकाली मृत्यू झाल्याने संसाराची सारी जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. या माउलीने छोट्या शंकराला काहीही कमी पडू दिले नाही. पाच वर्षापर्यंत त्याची मुंज करून त्याला गुरूगृही धाडले. तिथे गेल्यावर छोट्या शंकराच्या अफाट प्रतिभेने गुरूही चकित झाले. अवघ्या दोन वर्षात या मुलाने वेद, पुराण, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी ग्रंथ कंठस्थ करून सगळ्यांना विस्मयचकित करून टाकले. गुरुंची सेवा करून घरी परतल्यानंतर ते मातेची सेवा करू लागले. त्याची मातृभक्ती मोठी विलक्षण होती. या माउलीला कालाडीपासून दूर असलेल्या आलवाई (पूर्णा) नदीत स्नान करण्याची इच्छा होती. शंकरने या नदीची प्रार्थना करून तिचा प्रवाह आपल्या गावाजवळ आणला आणि मातेची इच्छा पूर्ण केली. काही दिवसांनंतर शंकरचा विवाह करण्याचे त्याच्या आईच्या मनात घाटू लागले. पण त्यांना हे सगळे नको होते. त्याचवेळी एका ज्योतिषाने शंकरची पत्रिका पाहून हा मुलगा अल्पायुषी असेल असे सांगितले. त्यावर मग संन्यास घेण्याची शंकराची इच्छा आणखी प्रबळ झाली. संन्यास घेण्यासाठी त्याने आईजवळ हट्ट धरला अखेर मातेलाही त्याच्या या हट्टापुढे मान तुकवावी लागली. वयाच्या सातव्या वर्षी संन्यास घेऊन हे बालक देशभ्रमणासाठी निघाले. भ्रमण करताना ते नर्मदेच्या किनारी ओंकारनाथला आले. तेथे एक गुरू गोविंदपाद हे महायोगी अनेक वर्षांपासून तपश्चर्या करत असल्याचे शंकरार्यांच्या कानावर आले. त्यांच्याकडून शंकराचार्यांनी अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त केले. त्यानंतर गुरू आज्ञेने ते काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. वाटेत एका चांडाळाने त्यांची वाट रोखून धरली. त्या चांडाळाने त्यांना सांगितले, की तुमच्या शरीरात असलेल्या परमात्म्याची तुम्ही उपेक्षा करत आहात. त्यामुळे तुम्ही अब्राह्मण ठरता. त्यामुळे तुम्ही माझ्या मार्गातून दूर व्हा.'' चांडाळाच्या मुखातून देववाणी ऐकल्यानंतर, तुम्ही मला ज्ञान दिले म्हणजे आता तुम्ही माझे गुरू झाले आहात, असे सांगून शंकराचार्यांनी त्याला नमस्कार केला. त्यावेळी त्यांना चांडाळाच्या जागी त्यांना शिवाचे व चार देवांचे दर्शन झाले. काशीत राहिल्यानंतर शंकराचार्य महिष्मती नगरातील आचार्य मंडनमिश्र यांना भेटायला गेले. आचार्यांच्या घरात असलेली मैनासु्द्धा वेदमंत्र म्हणायची अशी ख्याती होती. शंकराचार्यांनी मंडनमिश्रांशी झालेल्या वादात त्यांचा पराभव केला. मंडनमिश्राचा पराभव होत असल्याचे पाहून त्यांची पत्नी शारदादेवी शंकराचार्यांना म्हणाली, की आपण माझ्या अर्ध्या अंगाचा पराभव केला आहे. माझा पराभव करून दाखवा तर तुम्ही खरे विजेते ठराल.शंकराचार्य संन्यासी होते, हे हेरून शारदादेवींनी त्यांना कामशास्त्रावर आधारीत प्रश्न विचारले. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची अडचण झाली. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी काही अवधी मागितला. त्यानंतर मग परकाया प्रवेश करून त्यांनी यासंदर्भातील सगळी माहिती जाणून घेतली. त्यानंतर मग त्यांनी शारदादेवींनाही वादात हरवले. काशीत असताना त्यांना बड्या विद्वानांना वादात हरविले. गुरूगृही आल्यानंतर अनेकांनी मग त्यांच्या हातून दीक्षा घेतली. यानंतर शंकराचार्यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार हेच व्रत हाती घेतले. अनेक ग्रंथ रचले. अद्वैत ब्रह्मवादी शंकराचार्य निर्विशेष ब्रह्मालाच सत्य मानत होते. ब्रह्मज्ञानात ते कायम निमग्न असत. एकदा ब्राह्ममुहूर्तावर ते स्नानासाठी मणिकर्णिका घाटावर जात होते. पण ते जात असलेली गल्ली अतिशय छोटी होती. त्या गल्लीतच एक स्त्री पतीच्या शवाचे डोके मांडीवर घेऊन विलाप करत होती. त्यावेळी आचार्यांच्या शिष्यांनी तिला बाजूला होण्याची विनंती केली. पण ती बाजूला झाली नाही. मग शंकराचार्यांनी स्वतःच तिला विनंती केली. त्यावेळी ती स्त्री म्हणाली, की 'आपण मला वारंवार हे शव बाजूला घेण्याची विनंती करत आहात. मग तुम्हीच या प्रेताला बाजूला व्हायला का सांगत नाही.' त्यावेळी हे प्रेत आहे. जिवंत माणूस नाही. हे शंकराचार्यांनी तिच्या लक्षात आणून दिले. पण मग त्या स्त्रीने त्यांना अडचणीत टाकणारा सवाल केला. 'हे महात्मा, शक्तीनिरपेक्ष सत्य हेच जगाचे कर्ता धर्ता आहे. मग शक्ती न लावताही हे शव का हटवले जाऊ शकत नाही'. या सवालावर आचार्यांना ही बाई साधीसुधी नाही हे लक्षात आले. समाधी लावल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की ही बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आदिमाया आहे. मग त्यांच्या तोंडातून आपोआप मातृवंदनेचे स्तोत्र बाहेर पडू लागले. आता शंकराचार्यांचे स्थान खूपच मोठे झाले होते. त्यांच्या ज्ञानाचा सागर रूंदावत गेला. त्यात अद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, निर्गुण ब्रह्मज्ञानाबरोबरच सगुण साकार रूपाची आराधनाही एकाचवेळी होती. ज्ञानाच्या अद्वैत भूमीवर निर्गुण निराकार ब्रह्म आहे. तेच ब्रह्म द्वैताच्या भूमीवर मात्र सगुण साकार रूपात आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी निर्गुण व सगुण दोन्हीचे समर्थन करून निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी सगुणाच्या शिडीचा वापर करणे अपरिहार्य असल्याचे मत मांडले. ज्ञान व भक्तीच्या मीलनाच्या भूमीवर अद्वैत ज्ञान हेच शेवटी लक्ष्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी 'ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या' असे सांगितले. शिव, पार्वती, गणेश, विष्णू यांची भक्तिरसात ओथंबलेली स्तोत्रे रचली. सौंदर्य लहरी, विवेक चूडामणी असे महान ग्रंथ रचले. शिवाय प्रस्तान त्रयीवर भाष्यही लिहिले. शैव-वैष्णवांमधील भांडणाची समाप्ती त्यांनी घडवून आणली. पंचदेवोपासनेची प्रथा पाडली. संपूर्ण भारताचा प्रवास करून देशाच्या चार दिशांना चार आश्रमांची स्थापना केली. संपूर्ण देशाला एका सांस्कृतिक, धार्मिक, दार्शनिक, आध्यात्मिक व भौगोलिक एकतेच्या सूत्रात बांधले. आयुष्याचे प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी नश्वर देह सोडून ते परमात्म्यात लीन झाले.

श्रीराम



भारतीय संस्कृतीत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून श्रीरामाकडे पाहिले जाते. 'मर्यादा पुरूषोत्तम' हे विशेषण त्यामुळेच श्रीरामाला दिले जाते. श्रीरामाला भगवान विष्णूचा सातवा अवतार मानतात. आयोध्याचा राजा दशरथ व कौसल्या यांचा राम थोरला मुलगा. त्याला लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न हे तीन सावत्र भाऊ होते. जनक राजाची कन्या सीता त्याची पत्नी. दशरथ राजाची पट्टराणी कैकयीने आपला मुलगा भरत याला आयोध्येचे राज्य मिळावे यासाठी रामाला १४ वर्षे वनवासात पाठवले. ही १४ वर्षे रामाने पत्नी सीता व धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्याबरोबर घालवली. या काळात त्याने जंगलातील ऋषींना त्रास देणारया अनेक असूरांचा वध केला. रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेत बंदिवासात ठेवले. तेव्हा तिला सोडवण्यासाठी व रावणाचा वध करण्यासाठी राम लंकेत गेला. या काळात रामाला हनुमान भेटला. हनुमानाच्या वानरसेनेची मदत घेऊन त्यांनी लंकेवर आक्रमण केले व रावणाचा वध केला. सीतेची सुटका केली. वनवास भोगल्यावर श्रीरामाचे पुन्हा अयोध्येत आगमन झाले. गुढ्या उभारून लोकांनी त्याचे स्वागत केले. त्यामुळे तो दिवस गुडीपाडवा म्हणून साजरा केला जातो. या काळत सर्वत्र आनंद, शांती, भरभराट होती. श्रीरामाच्या जीवनावर वा‍ल्मिकी ऋषिंनी रामायण हे महाकाव्य लिहिले.

श्रीगुरूदेव दत्त



दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीच्या विकासातील एक अद्बूत निर्मिती आहे. शैव, वैष्णव व शाक्त या तीनही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा दत्तात्रेयाचा प्रभाव गेली हजार बाराशे वर्ष भारतात विशेषतः महाराष्ट्रात गाजत आहे. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत, किंबहुना धर्मातीत आहे. महानुभावसंप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायात दत्तात्रेयाविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. तसेच खास दत्तभक्तीची परंपरा चालविणारा दत्तसंप्रदायही गेली पाचशे वर्ष महाराष्ट्रात नांदत आहे. या संप्रदायात दत्तात्रेयाला श्रद्धेय मानणाऱ्या उपासकांत हिंदूंबरोबर मुसलमानही आहेत. भारतीय संस्कृतीत वेदांतील इंद्र ही वीरदेवता आहे, तर मध्ययुगातील दत्त ही सिद्धदेवता आहे. दत्तात्रेय ही देवता भारतीयांच्या प्रगल्भ चिंतनाची निर्मिती आहे. भारतीय संस्कृतीतीत अत्यंत परिणत विचार आणि निगूढ भावना व्यक्त करण्यासाठी इतिहासाच्या गर्भातून हे अद्भूत प्रतीक जन्म पावले आहे. त्यात समग्रता आणि सामंजस्य असल्याने ते सार्वत्रिक श्रद्धेचा विषय बनले आहे. दत्त चरित्र हे सगुण साकार ईश्वरावताराचे नसून चिरंतन मुल्यांच्या विकास प्रक्रियेचे आहे आणि म्हणूनच दत्तात्रयेची उपासना ही सर्वोच्च जीवन मुल्याची साधना आहे. या देवतेच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे. त्यांच्या अवतारानंतर महाराष्ट्रात खास दत्तोपासनेचा संप्रदाय निर्माण झाला आणि औदूंबर, वाडी व गाणगापूर ही त्या संप्रदायाची प्रधान तीर्थस्थाने बनली. श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारातून जो दत्तोपासनेचा प्रवाह प्रवर्तित झाला. त्या प्रवाहाशिवाय दत्तोपासनेच्या क्षेत्रात अन्य प्रवाहही नांदत राहिले. परंतु, त्यांचे प्रवाह व्यापक नसल्याने ते वैयक्तिक उपासनेपुरतेच मर्यादित राहिले. त्यांना संप्रदायाचे स्वरूप आले नाही. आज ज्याला आपण दत्त संप्रदाय म्हणून ओळखतो, तो प्रवाह श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतार कार्यातून प्रकटला आहे. दत्त संप्रदायाचे उपास्य असलेला दत्तात्रेय हा गुरूदेव आहे. त्याची उपासना गुरूस्वरूपातच करायची असते. श्रीगुरू किंवा गुरूदेव दत्त हा त्याचा जयघोष आहे. त्याचमुळे गुरूसंस्थेला प्राधान्य असलेल्या सर्व साधनप्रणालीत दत्तात्रेयाची पुज्यता रूढ झाली. परमार्थात गुरूसंस्थेचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. विकल्पविकारांचे तिमिर दूर सारून यथार्थज्ञानाचा प्रकाश दाखविण्यासाठी सद्गुरूची नितांत आवश्यक्ता असते. दत्तात्रेय हा परमगुरू असल्याने पथदर्शक गुरू आणि गुरूच्या मार्गदर्शनामुळे होणारी परमप्राप्ती हे दोन्ही विशेष त्याच्या स्वरूपात सामावले आहेत. दत्त संप्रदायात सगुणध्यानासाठी जरी दत्तात्रेयांचे सालंकृत सगुणरूप वापरले जात असले तरी पूजोपचारासाठी मूर्तीऐवजी पादुकांचे स्वरूप विशेष मानले जाते. औदुंबर, वाडी व गाणगापूर या तीनही ठिकाणी दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गुरूचरित्र, दत्तप्रबोध, दत्तमहात्म्य आणि गुरूलीलामृत हे ग्रंथ दत्त संप्रदायात विशेष मान्यता पावलेले आहेत.


विष्णूचा अवतार- श्री दत्तात्रय :-
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'अत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा.
श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.

श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

दत्तोपासनेतील सर्वोच्च स्थान-गाणगापूर:-
हे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे. श्रीनरसिंह सरस्वती येथे वाडीहून आले आणि सुमारें तेवीस वर्षे येथें राहून येथूनच श्रीशैलाकडे त्यांनी गमन केले. त्यांच्या दोन तपाएवढ्या प्रदीर्घ सन्निध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावलें आहे. श्रीगुरु जेव्हां येथे आले, तेव्हा प्रथम ते संगमरावरच राहत. नंतर ते गांवांत बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत.

वाडीच्या पादुकांना 'मनोहर पादुका' म्हणतात, तर तेथील पादुकांना 'निर्गुण पादुका' अशी संज्ञा आहे. जणू वाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ति कळसास पोचली होती - 'मनोहर बनली होती, तर येथें ते देहातीत- गुणरुपातीत होऊन 'निर्गुण' स्वरूप पावले होते. गुरूवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील 'निर्गुण पादुका' चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत 'उदक' सोडतात.

पादुका असलेला मठ गांवाच्या मध्यभागी आहे. मठाच्या पूर्वेस महादेवाचें स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव-पार्वती यांच्या मूर्ती ‍आहेत, पश्चिमेस अश्वत्थानचें झाड आहे. अश्वत्थाच्या पराभोंवती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशीवृंदावन आहे. मठांतील पादुकांच्या गाभार्‍याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीनें मढविलेला लहानसा झरोका आहे. या झरोक्यांतून दर्शनार्थींनी श्रीगुरूंच्या त्या चिरस्मरणीय 'निर्गुण पादुकां'चे दर्शन घ्यावयाचें असतें. अनेक साधकांना या पादुकांच्या ठायींच श्रीगुरूंचें दिव्य दर्शन झालें, असें सांगतात.

गावापासून एक मैल अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे. संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढें श्रीगुरूंची तपोभूती आहे. गाणगापूरच्या परिसरांत षट्‍कुलतीर्थ, नरसिंहतीर्थ, भागीरथीतीर्थ, पापविनाशीतीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत.

गाणगापूरच्या उत्सव-संभारांत दत्तजयंती आरि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्व आहे. श्रीगुरूंचें सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेंच घडलें आणि आपल्या दिव्योदात्त विभूतिमत्त्वाचें सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूंत संक्रमित केलें. त्याचमुळें गेली पांच शतकें हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयांत असीम श्रद्धेचा विषय बनले आहे.

(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)